शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं कसं केले खच्चीकरण? रामदास कदमांचा दावा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 10:14 IST

राज ठाकरेंचे कुठे चुकते यावरही रामदास कदमांनी थेट भाष्य केले

मुंबई – शिवसेनेत असताना राज ठाकरेंवर अन्याय झाला, उद्धव ठाकरेंपेक्षाराज ठाकरेंना अध्यक्षपद मिळायला हवं होतं असं विधान शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे. कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यात पुन्हा एकदा रामदास कदमांनी शिवसेनेतील ठाकरे बंधू वादावर भाष्य केले आहे.

रामदास कदम म्हणाले की, निश्चितपणे राज ठाकरे यांच्यावर १०० टक्के अन्याय झालाय. उद्धव ठाकरेंना जेव्हा अध्यक्ष केले तेव्हा राज ठाकरेंना अध्यक्ष केले असते तर निश्चित महाराष्ट्रातील मराठी माणसांना न्याय मिळाला असता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची छबी म्हणून राज ठाकरेंकडे पाहिले जाते. त्यांचे वकृत्व, कतृत्व, त्यांचे बोलणे, चालणे हे सगळे बाळासाहेबांशी जुळते आहे. दुर्देवाने हे घडायला नको होतं, पण ते झाले. उद्धव ठाकरेंच्या आधी राज यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे कितीतरी नंतर आले होते असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत राज ठाकरेंचे कुठे चुकते यावरही रामदास कदमांनी थेट भाष्य केले, ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत, शेवटच्या माणसांपर्यंत पोहचत नाहीत. मुंबई शक्यतो सोडत नाही. त्यांनी मुंबईच्या बाहेर पडले पाहिजे. गावागावात, वाडीवाडीत, जिल्ह्यात गेले पाहिजे. सुखदुखात लोकांच्या सहभागी झाले पाहिजेत. निश्चितपणे त्यांना भवितव्य आहे. आम्ही एकत्र काम केले आहे. मी राज ठाकरेंच्या अतिशय जवळ होतो, म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्यावर संधी मिळाली तेव्हा अन्याय केला, जे जे राज ठाकरेंसोबत होते त्यांना उद्धव ठाकरेंनी लांब केले. केवळ शिवसेनाप्रमुखांचा मला आशीर्वाद होता असंही रामदास कदम यांनी म्हटलं.

तसेच कुणी उठून मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असं बोलून कोणी होतं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी करून ते काँग्रेससोबत गेले. उद्धव ठाकरेंचा वाईट स्वभाव आहे. राज ठाकरेंच्या घरी कोण कोण आहे हे पाहण्यासाठी माणूस पाठवायचे. त्यानंतर तो रिपोर्ट आल्यानंतर त्या त्या माणसांची खाट पाडायचे असा आरोपही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना