शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कहाँ गया उसे ढूँड़ो ! मुंब्य्रामध्ये राष्ट्रवादीचे बस स्टॉप शोध अभियान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 13:58 IST

मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु केली आहे. मात्र, बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कहाँ गया उसे धुँडो, हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले.   

ठाणे: मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु केली आहे. मात्र, बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कहाँ गया उसे धुँडो, हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले.   

मुंब्रा-कौसा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यानंतर नियमितपणे टीएमटीची बससेवा सुरु करण्यात आली. मात्र, ही बससेवा सुरु झाल्यानंतरही येथील बसथांबे गायब झालेले आहेत. जे बसथांबे होते तेही आता दिसेनासे झाले आहेत. त्या निषेधार्थ  आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, सय्यदअली अश्रफ, ऋता आव्हाड, मिलींद पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली शानू पठाण आणि शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी दुर्बीण घेऊन बसस्टॉप शोधण्याचा प्रयत्न केला. कौसा पोलीस चौकीपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.यावेळी  शानू पठाण यांनी कहा गया उसे धुंडो,  असे गाणे गायले.  या आंदोलनात अनिता किणे, राजन किणे, सिराज डोंगरे, नदीरा सुर्मे, आशरीन राऊत, फरजाना शाकीर शेख, मेराज खान, जफर नोमानी, हसीना अजीज शेख, साजिया अन्सारी, रुपाली गोटे, मोरेश्वर किणे, सुलोचना पाटील, बाबाजी पाटील, सुनिता सातपुते, जमिला खान आदी सहभागी होणार आहेत.    

या वेळी शानू पठाण यांनी, सुमारे साडेआठ हजार लोक दररोज टीएमटीने प्रवास करीत असतात. या आधी कौसा ते रेतीबंदर दरम्यान 30 थांबे होते. आता   मात्र बसथांबाच दिसत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. मुंब्य्रातील नगरसेवकांनी या संदर्भात महासभेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी आणि प्रशासन मुंब्य्रातील नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करुन महासभेत आवाज दाबणाऱयांना आम्ही जनसभेत उत्तर देऊ; तसेच, बसथांबे उभारेपर्यंत हे आंदोलन असेच सुरु ठेऊ,  असा इशारा शानू पठाण यांनी दिला 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे