शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Maharashtra election 2019 : 'मुख्यमंत्री खोटारडा, महाराष्ट्र खड्डेमुक्त कधी करणार', फडणवीसांना 'राज'चा सवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 21:20 IST

Maharashtra election 2019 : पहिल्या वर्षात आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या, असं ते सांगतात. खोटं का बोलायचं? खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची डोंबिवली येथे जाहीर सभा झाली. त्यामध्ये बोलताना मी आज भाषण करायला न येता, फक्त गप्पा मारायला आलो आहे, असे म्हटले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी विकासांसदर्भात काही भाष्य केलं. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. त्यापूर्वी, पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभार वांझोटा असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री चांगला माणूस, उच्चशिक्षित माणसू पण खोटं का बोलतात. 

पहिल्या वर्षात आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या, असं ते सांगतात. खोटं का बोलायचं? खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही, असे म्हणत राज यांनी महाराष्ट्रातील अपघातांची मालिकाच आपल्या भाषणात वाचून दाखवली. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातून निष्पापांना जीव गमावला लागला, हे राज यांनी सांगतिलं. राष्ट्रीय कॅरेमपट्टूचा नुकताच अपघातात मृत्यू झाला. ठाण्यातील एक तरुणी स्वत:च्या लग्नाची खरेदी करायला जाताना, खड्ड्यातून गाडी गेल्यानं तिचा अपघात झाला. त्यामध्ये दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. राज्यात 14 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, पण आम्हाला काय?. आजपर्यंत राज्य करणाऱ्या राजकारणांना याबबात विचारायचं नाही क? असे राज यांनी म्हटले. तसेच, येथील आमदार रविंद्र चव्हाण यांना मंत्री केलं, तुम्ही प्रश्न का विचारत नाहीत, असा प्रश्नच राज यांनी उपस्थितांना विचारला.   दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? राज्यात एवढा पूर आला की कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, असं म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला होता. पुण्यातील कसबा येथे सोमवारी रात्री त्यांची सभा पार पडली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019