शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

आदिवासींना खावटी अुनदान केव्हा?, मंत्र्यांच्या घोषणेनंतरही अंमलबजावणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 6:56 PM

आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी कर्ज योजनेतून अन्नधान्य, अनुदान मिळायचे. यात ८०० रुपयांचा धनादेश, तर १४०० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याची योजना होती.

ठळक मुद्देशासनाने १०० दिवस पूर्ण केले असतानाही आदिवासींच्या खावटी अनुदानाला मान्यता मिळाली नाही. 

-  गणेश वासनिक

अमरावती : कोरोनाने दुर्गम भागातील आदिवासींचा रोजगार हिरावला. त्यामुळे आदिवासी कुटुंबांवर रोजगारअभावी उपासमारीची वेळ आली आहे. आदिवासी विकासमंत्र्यांनी जाहीर करूनही खावटी अनुदान वितरण सुरू केलेले नाही. 

आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी कर्ज योजनेतून अन्नधान्य, अनुदान मिळायचे. यात ८०० रुपयांचा धनादेश, तर १४०० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याची योजना होती. आदिवासींनी परतफेड केली नाही म्हणून खावटी कर्ज योजना सन २०१२ मध्ये गुंडाळण्यात आली. मात्र, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी पालघर येथे सार्वत्रिक कार्यक्रमात खावटी अनुदानाची घोषणा केली होती. परंतु, शासनाने १०० दिवस पूर्ण केले असतानाही आदिवासींच्या खावटी अनुदानाला मान्यता मिळाली नाही. 

हल्ली कोरोना महामारीत आदिवासी कुटुंबांची रोजगाराअभावी परवड झाली आहे. मुला-बाळांच्या शिक्षणाचे काही खरे नाही. पोट जगविणे कठीण झाले असल्याचे वास्तव आहे. परिणामी खावटी अनुदान सुरू करून जगण्याची उमेद निर्माण करावी, अशी मागणी विविध आदिवासी संघटनांकडून होत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार सोडून परतलेल्या मेळघाटातील आदिवासी मजूर, कामगारांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक असल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 

१० लाख कुटुंबीयांना मिळेल खावटी अनुदान...राज्यात एपीएल, बीपीएल असलेल्या १० लाख आदिवासी कुटुंबीयांना खावटी अनुदान देण्याचे नियोजन आहे. येत्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आवर्जून घेण्यात आला आहे. कॅबिनेटमध्ये मान्यता मिळताच त्वरेने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जिल्हाधिकारी, एकात्मिक प्रकल्प अधिकारी स्तरावरून खावटी अनुदान लाभार्थींची सविस्तर माहिती मागविली जाणार असल्याचे ते म्हणाले.  

मंत्र्यांनी घोषणा करूनही आदिवासींना खावटी अनुदान मिळाले नाही. शासन आदेश न काढता खावटीबाबतचे प्रस्ताव मागवून आदिवासी समाजाची दिशाभूल केली जात आहे. यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहारदेखील करण्यात आला आहे.- अशोक उईके, आमदार तथा माजी मंत्री, आदिवासी विकास.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीK. C. Padaviके. सी. पाडवी