शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंचा राजीनामा कधी घेणार?; अंजली दमानियांसह अंबादास दानवे, सुरेश धस यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 07:44 IST

सरपंच संतोष देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण, भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अंजली दमानिया, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करत आहेत.

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही विचारला आहे.

दमानिया यांनी एक्स समाजमाध्यमावर म्हटले आहे की, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन २ महिने पूर्ण झाले. आज तरी राजीनामा घेणार का? आज संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक सविस्तर पत्र, ज्यात धनंजय मुंडे यांच्यावरचे सगळे आरोप, मी पुराव्यासकट मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, इलेक्शन कमिशन, सीबीआय, कॅग आणि लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाला पाठवत आहे. यांचा पाठिंबा जर वाल्मीक कराडला नसता, तर ही क्रूर हत्या झाली नसती. अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटा देखील रिट्राइव झालेला नाही. तो बडा नेता कोण आहे, अजून का कळले नाही? जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत दबाव राहणार, असे दमानिया यांनी म्हटले आहे.    

‘धनंजय मुंडेंनी पदापासून दूर व्हावे’भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अंजली दमानिया, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करत आहेत. आमच्या जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केली आहे. अनेक संघटना मागणी करत आहेत, पण मी स्वत: अजून त्यांचा राजीनामा मागितला नाही. या तपासात आकापर्यंत एसआयटी गेली आहे. आकाच्या पुढे गेल्यानंतर बोलू. त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा, हे सर्वस्वी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हातात आहे.    

पोलिसांनी आरोपींना अभय दिले : धनंजय देशमुख

गुंडांसोबत पोलिस अधिकाऱ्यांची उठबस होती. त्यांनीच अभय दिले. त्यामुळेच हत्येची घटना घडल्याचा गंभीर आरोप मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. सर्वात मोठे पाप हे केज पोलिसांनी केल्याचेही ते म्हणाले. भावाच्या हत्येला दोन महिने झाले, परंतु एक क्षणही आठवणीशिवाय जात नाही. या वेदना भयानक असून यातून कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही बाहेर आलेले नाहीत. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांसोबत   मांडीला मांडी लावून बसत होता. एका कार्यालयात त्यांचे चहापाणी होत असे. त्याला अभय दिले. त्याच्यावर वेळीच कारवाई केली असती तर अशा घटना टळल्या असत्या, असे देशमुख म्हणाले.

हत्येला दोन महिने झाले, तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजून पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज नव्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत, असे असताना त्यांचा राजीनामा का घेत नाही? -अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते. 

बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाचा मी अनेकदा निषेधच केला आहे. संपूर्ण प्रकरण सरकार संवेदनशील पद्धतीने हाताळत असून, या प्रकरणातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही? हा निर्णय मुख्यमंत्री व दोघे उपमुख्यमंत्रीच घेतील. -पंकजा मुंडे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धसanjali damaniaअंजली दमानिया