शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

11 लाख आदिवासी कुटुंबांना मदत मिळणार कधी?, ऑगस्टमध्ये निर्णय, तरी फक्त सर्वेक्षणाचाच घोळ

By यदू जोशी | Updated: November 5, 2020 06:44 IST

tribal : १२ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर १७ सप्टेंबरला शासन आदेश निघाला होता. त्यालाही आता दीड महिना लोटला आहे.

-   यदु जोशी

मुंबई : ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने १२ ऑगस्ट रोजी घेतला होता.  तीन महिने होत आले तरी अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ४८६ कोटी रुपयांच्या मदतीपासून आदिवासी कोरोनाच्या संकटकाळात वंचितच राहिले आहेत. आधी लाभार्थींची संख्या जाहीर केली आता लाभार्थी ठरविण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. १२ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर १७ सप्टेंबरला शासन आदेश निघाला होता. त्यालाही आता दीड महिना लोटला आहे. प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यात दोन हजार रुपये टाकायचे आणि मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा दोन हजार रुपये किमतीचा किराणा देण्याचा निर्णय झाला होता. कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका आदिवासींना बसला. शहरात रोजगारासाठी गेलेले आदिवासी बांधव पाडे, गावांकडे परतले. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, हा विषय ‘लोकमत’ने सातत्याने मांडला. या दिरंगाई संदर्भात आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांना वारंवार विचारणा केली पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शासन निर्णयानुसार, मनरेगावरील चार लाख मजूर, आदिम जमातीची २ लाख २६ हजार कुटुंबे, ६४ हजार पारधी कुटुंबे, गरजू परितक्त्या, घटस्फोटित, विधवा, भूमिहिन यांची तीन लाख कुटुंबे आणि वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या १ लाख ६५ हजार कुटुंबांना ही मदत दिली जाणार होती. अद्याप त्यांच्या नशिबी प्रतीक्षाच आहे. 

मदत तर दूरच सर्वेक्षणाचा घोळ सुरूप्रत्येकी ४ हजार रुपयांची मदत कोणत्या ११ लाख ५५ हजार कुटुंबांना देणार हे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी आदिवासींची नावे निश्चित करण्यासाठी सर्वेक्षणाचा घोळ घातला जात आहे. या सर्वेक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांना कामाला जुंपण्यात आले आहे. सर्वेक्षणही किचकट आहे. आदिवासींना जातीचा दाखला, आधार कार्डापासून अनेक प्रकारची माहिती मागितली जाणार आहे. हे सर्वेक्षण होणार कधी? अन् मदत मिळणार कधी? वित्त विभाग आणि आदिवासी विभागातील मतभिन्नतेचा फटकाही मदतीला बसला असल्याची चर्चा आहे. 

लॉकडाऊनमुळे गाव/पाड्यांवर परतलेले हजारो आदिवासी मजूर आता पुन्हा कामाच्या ठिकाणी जात आहेत. तरीही सरकारी मदतीचा घोळ सुरू आहे. शासनाच्या दिरंगाईमुळे आदिवासींना कोरोनाच्या संकटात मदत देण्याचा उद्देशच पराभूत होत आहे.     - प्रतिभा शिंदे, अध्यक्ष, लोकसंघर्ष मोर्चा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र