शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

आपलं सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही ही सरसकट कर्जमाफीची असेल- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 18:04 IST

शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आता बघवत नाही, असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितले.  

विकासासाठी जर काही जण तिकडे गेले असतील, तर शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाही? आजची बातमी होती की शेतकऱ्यांचा कांदा एक रुपयाला जातोय, तो शेतकरी ढसाढसा रडत होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आता बघवत नाही, असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितले.  शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती, सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश मांडला.

शेतकरी त्याच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे करणार? महाराष्ट्रात ही सर्व परिस्थिती दडपशाहीची आहे. आपले सरकार आल्यावर सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन तत्त्वांवर चालेल. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, शेतकऱ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या व माझ्या महाराष्ट्राचा,आपले सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही ही सरसकट कर्जमाफीची असेल, असं आश्वासन देखील सुप्रिया सुळेंनी दिलं. 

ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सचा वापर करून लोकांची घरं व पक्ष फोडायचे पण कांद्याला आणि दुधाला भाव द्यायचे नाही. फक्त पोस्टरबाजी करायची हे भारतीय जनता पार्टी म्हणजेच भ्रष्ट जुमला पार्टीचे काम आहे. शेतकऱ्यांबद्दल काहीच त्यांच्या बॅनरवर दिसत नाही, त्यांच्या पोस्टरबाजीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाही. त्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात आपली लढाई आहे, वैयक्तिक आमचा कुणाशीही काहीच संबंध नाही. आपल्याला या ब्रिटिश सरकार विरोधात लढायचे आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

अंगणवाडी भगिनींवर इतका अन्याय होत आहे. आज त्यांच्याकडून चाव्या हिसकावून घेतल्या जात आहेत. अंगणवाडीचे टाळं तोडून भलत्याच लोकांना काम दिल जातंय. यामुळे सरकार हे खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आम्ही अंगणवाडीच खासगीकरण होऊन देणार नाही. आम्ही त्यांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेस