शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२०१४ मध्ये मोदी जिंकले तेव्हा शिवसेनेनेही म्हटले होते ‘देश पुन्हा स्वतंत्र झाला’ भाजपाने थेट पुरावाच दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 20:14 IST

Shiv Sena-BJP Politics: स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून शिवसेना नेते Sanjay Raut यांनीही Kangana Ranaut आणि Vikram Gokhale यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता या वादात BJPनेही उडी घेतली असून, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर Saamana दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे.

मुंबई - कंगना राणौतने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. १९४७ रोजी मिळाली ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य तर २०१४ रोजी मिळाले, असे विधान कंगनाने केले होते. त्यानंतर या विधानाला विक्रम गोखलेंसारख्या ज्येष्ठ कलावंतांनी पाठिंबा दिल्याने प्रकरण अधिकच चिघळले. तेव्हापासून कंगना आणि विक्रम गोखलेंवर टीका सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या विधानांवरून कंगना आणि विक्रम गोखलेंना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता या वादात भाजपानेही उडी घेतली असून, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सामना दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे.

भाजपाचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात सामना वृत्तपत्राचा एक फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशात स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला होता. दरम्यान, महाराष्ट्रामध्येही शिवसेना भाजपा महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले होते. त्यात शिवसेनेला १८ तर भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, त्या विजयाचा आनंद व्यक्त करताना दुसऱ्या दिवशी सामनाच्या मुख्य बातमीचे शीर्षक हिंदुस्थान काँग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!! असे दिले होते. हेच कात्रण आता भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे. आता याला शिवसेना काय प्रत्युत्तर देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी स्वातंत्र्यावरून केलेल्या विधानावरून कंगना राणौतवर जोरदार टीका केली होती. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतAtul Bhatkalkarअतुल भातखळकरKangana Ranautकंगना राणौत