शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ मध्ये मोदी जिंकले तेव्हा शिवसेनेनेही म्हटले होते ‘देश पुन्हा स्वतंत्र झाला’ भाजपाने थेट पुरावाच दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 20:14 IST

Shiv Sena-BJP Politics: स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून शिवसेना नेते Sanjay Raut यांनीही Kangana Ranaut आणि Vikram Gokhale यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता या वादात BJPनेही उडी घेतली असून, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर Saamana दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे.

मुंबई - कंगना राणौतने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. १९४७ रोजी मिळाली ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य तर २०१४ रोजी मिळाले, असे विधान कंगनाने केले होते. त्यानंतर या विधानाला विक्रम गोखलेंसारख्या ज्येष्ठ कलावंतांनी पाठिंबा दिल्याने प्रकरण अधिकच चिघळले. तेव्हापासून कंगना आणि विक्रम गोखलेंवर टीका सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या विधानांवरून कंगना आणि विक्रम गोखलेंना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता या वादात भाजपानेही उडी घेतली असून, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सामना दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे.

भाजपाचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात सामना वृत्तपत्राचा एक फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशात स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला होता. दरम्यान, महाराष्ट्रामध्येही शिवसेना भाजपा महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले होते. त्यात शिवसेनेला १८ तर भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, त्या विजयाचा आनंद व्यक्त करताना दुसऱ्या दिवशी सामनाच्या मुख्य बातमीचे शीर्षक हिंदुस्थान काँग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!! असे दिले होते. हेच कात्रण आता भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे. आता याला शिवसेना काय प्रत्युत्तर देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी स्वातंत्र्यावरून केलेल्या विधानावरून कंगना राणौतवर जोरदार टीका केली होती. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतAtul Bhatkalkarअतुल भातखळकरKangana Ranautकंगना राणौत