शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कर्जमाफी मिळणार तरी कधी ? शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 12:47 IST

विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

मुंबई - मागील काही वर्षांपासून राज्यात पडलेला दुष्काळ आणि यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना आता नव्या सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची प्रतीक्षा लागली आहे. कर्जमाफी करण्याचे आश्वासन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून देण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकरी नव्या सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत. 

राज्याची आर्थिक स्थिती आणि शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेतल्यानंतरच कर्जमाफीची घोषणा होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.  त्यामुळे विधीमंडळात कर्जमाफीची घोषणा होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अधिवेशनाकडे शेतकरी वर्ग लक्ष ठेवून आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

भाजपच्या काळात शेतकरी कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र निकष आणि अटींमुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित होते. तसेच फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीच्या घोषणेसाठी मोठा कालावधी लागला होता. त्यावेळी त्यांनी कर्जमाफीसंदर्भात अभ्यास सुरू असल्याचे म्हटले होते. आता ठाकरे सरकारही अद्याप अभ्यासच करतय का, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत.