शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

विजयी होऊ शकणाऱ्यांना उमेदवारी देण्यात काय चूक? - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:34 IST

भाजपाला दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागतात, याचा अर्थच या पक्षाला विस्तार करता आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- अतुल कुलकर्णी  मुंबई  - भाजपाला दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागतात, याचा अर्थच या पक्षाला विस्तार करता आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. घराणेशाहीविषयीची त्यांची मते मात्र अस्पष्ट दिसली.तुमच्या पक्षात तरी शरद पवार ते पार्थ पवार, असे घराणे आहे. अनेक नेत्यांच्या मुलांसाठी पक्षाने कार्यकर्त्यांना दूर सारले.शरद पवार यांनी आर.आर. पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला नेता केल्याचे राज्याने पाहिले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेकांना त्यांनी नेता बनवले. राहिला प्रश्न घराणेशाहीचा वा नेत्यांच्या मुलांचा. ज्या नेत्यांच्या मुलांनी स्वत:ला सिद्ध केले आहे, तेथील लोकांनी जर त्याचे नेतृत्व मान्य केले आहे आणि ज्याच्यामध्ये इलेक्टीव्ह मेरिट आहे, अशा तरुणांना आम्ही उमेदवारी देण्यात चूक काहीच नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.पण हाच न्याय तुम्ही सुजय विखे यांना दिला नाही. त्यांना उमेदवारी का नाकारली ?नगर जिल्हा राष्टÑवादीची ताकद असलेला आहे. ६ पैकी ५ जागा आम्ही तेथे लढत आलोय. आमचाच पक्ष भाजपाचा पराभव करू शकतो हे आम्हाला माहिती असल्यामुळेच आम्ही ती जागा स्वत: लढवण्याचा निर्णय घेतला. लागणारा निकालच तुम्हाला याचे उत्तर देईल आणि सुजयला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, आम्ही ती जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला, एवढाच त्याचा अर्थ आहे.छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक असे अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत जाण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन नेतृत्व कसे उभे राहणार?प्रत्येकाने कोठे काम करावे हा निर्णय स्वत: घ्यायचा असतो. गणेश नाईक यांनी आनंद परांजपे यांचे नाव सुचवले, तर दिलीप वळसे पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा तरुण चेहरा पक्षात आणला. त्यामुळे नव्यांना संधी दिलीच. भुजबळ यांची व्यक्तिगत कारणांमुळे दिल्लीत जाण्याची इच्छा नाही.भाजपा सोशल मीडियामध्ये आघाडीवर आहे. मग तुमचा पक्ष मागे का?भाजपाकडे सोशल मिडीया चालवणारे पगारी नोकर आहेत. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षाच्या विरोधात लिहीणाऱ्यांना ट्रोल करत असतात. मोठी संख्या त्यांनी पगारावर पोसली आहे, कारण त्यांच्याकडे सत्ता आहे, साधनसंपत्ती आहे. आमची तशी परिस्थिती नाही. पण एवढे करूनही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व भाजपाची खिल्ली सध्या उडवली जात आहे.राज ठाकरे यांच्या मनसेसाठी तुम्ही एक जागा सोडणार होतात. त्याचे काय झाले?राज ठाकरे यांचे सहकार्य घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांच्या सभांना गर्दी होते. त्यांची भाषणे टोकदार असतात. राज यांचे आताचे भाषण मुख्यमंत्र्यांना एवढे झोंबले की, त्यांनी भाजपा शिवसेनेच्या संयुक्त सभेत अशा भाषणांनी विचलीत होऊ नका, असे सांगितले. राज ठाकरे स्वतंत्र विचारांचे आहेत आणि ते आघाडीत नसले तरी भाजपाला विरोध करणाºयाचे आमच्याकडे कायम स्वागतच आहे.प्रकाश आंबेडकर यांच्याशी कोठे बिनसले? त्याचा काय परिणाम होईल?दोन्ही काँग्रेसने त्यांच्यासोबत तीन चार बैठका घेतल्या. त्यांना चार जागा देण्यास तयारी दर्शवली. मात्र त्यांनी नांदेड, बारामतीच्या जागाही मागितल्या, तेव्हा लक्षात आले की ते कोणाचे तरी हस्तक म्हणून काम करत आहेत व त्यांना धर्मनिरपेक्ष विचारांना एकत्र आणण्याची इच्छा नाही. राज्यघटना बदलण्याची भूमिका संघाचे लोक घेत आहेत. अशा विचारांच्या लोकांचे राज्य घालवण्यासाठी त्यांनी अजूनही आमच्यासोबत यावे. अन्यथा त्यांच्यामुळे भाजपाला मदत होत आहे हा आक्षेप खरा ठरेल.पक्ष मजबूत करण्यासाठी आयाराम गयारामांवर अवलंबून न राहता, प्रमुख कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, असे सांगत काहीही करून निवडणूक जिंकणे हे एवढेच ध्येय असता कामा नये, असेही ते म्हणाले. मात्र पक्षातील घराणेशाहीबद्दल ते म्हणाले की, निवडणूक जिंकू शकणाºयांना उमेदवारी देण्यात काहीच चूक नाही.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक