शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Devendra Fadnavis: औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचं काय होणार? फडणवीसांकडून चर्चेवर पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 14:40 IST

"खरे तर राज्यपालांचे पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वासमत प्राप्त होत नाही, तोवर कॅबिनेटची मिटिंग घ्यायची नसते, हा संकेत आहे. तरी तुम्ही कॅबिनेटची बैठक घेतली."

संपूर्ण वाटचालीत एक शिवसैनिक आज राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांची एकूण कारकीर्द आणि स्वभाव बघितला तर, नेत्यांच्या उपलब्धतेचे जे डेफिसिट तयार झाले होते ते दूर होईल. लोकांना आपले नेते आपल्यात हवे, असे सातत्याने वाटत होते. हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. मुंबईतच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, एका कॉलवर आणि शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न हा नेता करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. ते शिंदे सरकारने बहुमताची अग्नीपरीक्षा जिंकल्यानंतर विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, "भलेही शेवटच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही काही निर्णय घेतले. खरे तर राज्यपालांचे पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वासमत प्राप्त होत नाही, तोवर कॅबिनेटची मिटिंग घ्यायची नसते, हा संकेत आहे. तरी तुम्ही कॅबिनेटची बैठक घेतली. त्या बैठकीत काही निर्णयही घेतले मग तो संभाजीनगरचा असो, धाराशिवचा असो की तो दि. बा. पाटील यांचा असो किंवा इतरही काही निर्णय असतील. जरी ती कॅबिनेट संकेताप्रमाणे घेता येत नाही, तरी तुम्ही निर्णय घेतले असले तरी, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की आपलीही भूमिका तीच आहे. आपणही त्याच भूमिकेचे आहोत." 

तसेच, यामुळे काळजी करू नका.  तुमच्या शेवटच्या कॅबिनेटचे निर्णय पुन्हा कॅबिनेटमध्ये घेऊन ते निर्णय लागू करण्याचे काम हे सरकार करेल, हा विश्वास तुम्हाला देतो. तसेच संपूर्ण सभागृहाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचे अतीशय मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि विरोधी पक्षालाही सहकार्याची विनंती करतो, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभा