शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:48 IST

महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करून झाले आता येणाऱ्या काळात भगतसिंगाच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करू असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला. 

लातूर - राज्यभरात शेतकऱ्यांची व्होटबँक तयार करून राजकारण्यांना धडा शिकवू. सोयाबीन, कापसाचे धोरण कोण आणेल, त्याबाबत आश्वासन कोण देईल यावर आमच्याशी कोण चर्चा करणार, निवडणुकीपुरता आमचा वापर होऊ देणार नाही. जो दिर्घकालीन धोरण आणण्याचं काम करेल, सकारात्मक चर्चा करेल तेव्हा आम्ही शेतकरी मिळून पुढचा निर्णय घेऊ असं विधान उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिले आहे.

रविकांत तुपकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं होतं, त्यांनी चर्चेला दिलेल्या निमंत्रणावरून मी गेलो होतो. आम्ही २५ जागांवर शेतकऱ्यांच्या तरूण पोरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवतोय. जे शेतकऱ्यांसाठी लढतात, भांडतात. पण त्यांनी सांगितले, २५ जागांवर तुम्ही लढण्यापेक्षा आमच्यासोबत या...पण आम्हाला मुद्द्यांमध्ये रस आहे. सोयाबीन, कापसाच्या प्रश्नावर जो कोणता पक्ष चांगले धोरण आणेल, जो कुणी आश्वासन देईल आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेऊ. अजून कुठलाही निर्णय झाला नाही. ती प्राथमिक चर्चा झाली. त्यांच्या निमंत्रणावरून आम्ही चर्चेला गेलो होतो. आमच्या प्रभावशाली जागा आहेत, जिथे निर्णायक मते आमच्याकडे आहे. शेतकऱ्यांची ताकद जोपर्यंत राजकीय होत नाही तोपर्यंत या लोकांना कळणार नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्व. अण्णासाहेब जावळेंच्या पुढाकाराने छावा संघटना स्थापन झाली, आज अण्णासाहेब नाहीत, परंतु त्यांचे पदाधिकारी आज संघटना पुढे घेऊन जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही तुकड्या तुकड्यात आंदोलन करण्यापेक्षा एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटना एकत्रित येऊ नये अशी सरकारची भावना आहे. जर सर्व शेतकरी एकत्र आले, आंदोलन केले तर या सरकारला पळताभुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. सोयाबीन, कापसाला भाव नाही, वन्य जनावरांचा त्रास आहे. अनेक आंदोलने महाराष्ट्रात झाली परंतु सरकार जाग येत नाही. महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करून झाले आता येणाऱ्या काळात भगतसिंगाच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करू असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला. 

दरम्यान,  सरसकट शेतकऱ्यांना मदत द्या, हेक्टरची मर्यादा घालू नका. अजितदादांसोबत चर्चा झाली तेव्हा अमित शाहांकडे मुख्यमंत्र्‍यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ न्या, तिथे सोयाबीन निर्यातीचा, तेलावरील आयात शुल्क वाढवा. आम्ही स्टॉक मर्यादा लावणार नाही म्हणजे सोयाबीनचे दर वाढतील असं सांगितले होते. मात्र अद्याप शिष्टमंडळ गेले नाही. सोयाबीन, कापूस उत्पादकांना दिलासा सरकारने द्यावा नाहीतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांच्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल असंही तुपकरांनी म्हटलं. 

...तर नेत्यांना गावबंदी

जो सोयाबीन आणि कापसाचा विषय घेणार नाही अशा नेत्यांना गावबंदी करणार आहोत. शेतकरी नेत्यांना जाब विचारणार. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठं आंदोलन मराठवाडा, विदर्भ तिथे दौरा करू. शेतकऱ्यांची व्होटबँक तयार करून राजकारण्यांना धडा शिकवणार आहोत असं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRavikant Tupkarरविकांत तुपकरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४