जेलमध्ये घालायला काय मोगलाई आहे
By Admin | Updated: September 16, 2014 02:18 IST2014-09-16T02:18:29+5:302014-09-16T02:18:29+5:30
‘खोटं बोल, पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणो प्रसिद्धीसाठी खोटी स्टेटमेंट करणो हा भाजपाच्या नेत्यांचा स्थायीभाव आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनोद तावडे यांना लगावला.
जेलमध्ये घालायला काय मोगलाई आहे
अजित पवार : विनोद तावडेंना टोला
कोल्हापूर : ऊठसूट अजित पवार यांना जेलमध्ये घालायला ही काय मोगलाई आहे काय? असा सवाल करीत ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणो प्रसिद्धीसाठी खोटी स्टेटमेंट करणो हा भाजपाच्या नेत्यांचा स्थायीभाव आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना लगावला.
पवार म्हणाले की, भाजपा नेते नेहमी खोटे बोलतात. त्यांच्या सांगण्यावरून राज्य सरकारने एसआयटी नेमली. त्यांच्याच सांगण्यावरून माधवराव चितळे समिती नेमली. समितीचा अहवाल जाहीर केला. कोणताही घोटाळा झाला नाही हे स्पष्ट झाल्यानंतरही जर भाजपाचे नेते टीका करीत असतील, तर तो त्यांचा खोटारडेपणा आहे.
निवडणुका आल्या की ते असे बोलतात. 1995 मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते दाऊद इब्राहिमला मुसक्या घालून भारतात आणणार असे सांगत होते. सत्ता मिळाली, पण दाऊदला काही आणला नाही. वेगळी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविणो हा त्यांचा स्थायीभाव आहे.
शिवसेना विकासाच्या विरोधात
शिवसेना ही नेहमी विकासाच्या विरोधात राहिली आहे. कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांनी विरोध केला असला तरी आम्ही तो प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
उमेदवार ठरलेत,
144 जागांवर ठाम
पक्षाचे उमेदवार ठरले आहेत, परंतु कॉँग्रेसकडून काहीच हालचाली झाल्या नसल्याने पुढची चर्चा थांबलेली आहे. आघाडीची प्रक्रिया पुढे गेलेली नाही, म्हणून उमेदवार जाहीर केले नाहीत. येत्या दोन-चार दिवसांत ते जाहीर केले जातील, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेस 144 जागांवर आजही ठाम असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपाचे नेते दाऊद इब्राहिमला मुसक्या घालून भारतात आणणार असे सांगत होते. काय झाले ? वेगळी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविणो हा त्यांचा स्थायीभाव आहे, असेही पवार म्हणाले.