शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

Ajit Pawar: ...ही काय पद्धत झाली का? शिंदे-फडणवीसांना हे पटतं का? त्या मुद्द्यावरून अजित पवार संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:20 IST

Ajit Pawar Criticize Shinde Government: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे.

मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे.  तसेच राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा अशा भाषेत धमक्या दिल्या जात आहेत. ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, हे सरकार येऊन काही दिवस झाले आहेत. असं असाताना यांच्यातील काही आमदार हे महाराष्ट्रात संघर्ष पेटेल, अशी भाषा बोलताहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. हात तोडा, हात तोडता आले नाही तर तंगड्या तोडा, आरे ला कारे म्हणा, कोथळा काढा, अरे ही काय पद्धत झाली का. कुठे शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र, आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला. ज्यांनी नेहमी काम करताना राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा ही पद्धत, ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, असा सवाल अजित पावर यांनी उपस्थित केलाय.

अजित पवार पुढे म्हणाले की, शिंदे गटाच्या एका बहाद्दर आमदाराने सरकराच्या कर्मचाऱ्याला मारलं. म्हणजे तुम्ही कायदा हाती घेऊ लागला आहात. सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का तुम्हाला. शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी तिला कायदा नियम सारखे आहेत. कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीही मोठा नाही. या पद्धतीची भाषा अजून सुरुवात झाली नाही, एवढी मस्ती कशी आली आहे. यांना दोन गोष्टी समवजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी बघतोय. १५ ऑगस्ट रोजी एक आमदार अशी भाषा करतोय, तीही मुंबईसारख्या ठिकाणी. मग चांद्यापासून बांद्यापर्यंत सामन्य माणसांची अवस्था काय होईल, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना