शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: ...ही काय पद्धत झाली का? शिंदे-फडणवीसांना हे पटतं का? त्या मुद्द्यावरून अजित पवार संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:20 IST

Ajit Pawar Criticize Shinde Government: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे.

मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे.  तसेच राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा अशा भाषेत धमक्या दिल्या जात आहेत. ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, हे सरकार येऊन काही दिवस झाले आहेत. असं असाताना यांच्यातील काही आमदार हे महाराष्ट्रात संघर्ष पेटेल, अशी भाषा बोलताहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. हात तोडा, हात तोडता आले नाही तर तंगड्या तोडा, आरे ला कारे म्हणा, कोथळा काढा, अरे ही काय पद्धत झाली का. कुठे शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र, आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला. ज्यांनी नेहमी काम करताना राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा ही पद्धत, ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, असा सवाल अजित पावर यांनी उपस्थित केलाय.

अजित पवार पुढे म्हणाले की, शिंदे गटाच्या एका बहाद्दर आमदाराने सरकराच्या कर्मचाऱ्याला मारलं. म्हणजे तुम्ही कायदा हाती घेऊ लागला आहात. सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का तुम्हाला. शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी तिला कायदा नियम सारखे आहेत. कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीही मोठा नाही. या पद्धतीची भाषा अजून सुरुवात झाली नाही, एवढी मस्ती कशी आली आहे. यांना दोन गोष्टी समवजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी बघतोय. १५ ऑगस्ट रोजी एक आमदार अशी भाषा करतोय, तीही मुंबईसारख्या ठिकाणी. मग चांद्यापासून बांद्यापर्यंत सामन्य माणसांची अवस्था काय होईल, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना