शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेसाठी आनंदाची गोष्ट कोणती? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 15:13 IST

"सर्वोच्च न्यायालयाचे सर्व घडामोडींवर लक्ष आहे. विधानसभेचे अधक्ष्य या डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची हत्या करू शकत नाहीत."

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर साधारणपणे 11 महिन्यांनी निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालासंदर्भात बोलताना, "सत्ता नसून, शिवसेनेवरचा दावा फेटाळला. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकारांसोबत बोलत होते. 

आमच्यासाठी 'ही' सर्वात आनंदाची गोष्ट -राऊत म्हणाले, "आमच्यासाठी सर्वाद दिलासादायक गोष्ट म्हणजे, सत्ता नसून, शिवसेनेवरचा दावा फेटाळला. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सत्ता येते, सत्ता जाते. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर, कुणीही ऐरा-गैरा, चोर, दरोडे खोर, हा दावा करू शकत नाही. ही आमची भूमिका होती, आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे."

याच बरोबर, "सर्वोच्च न्यायालयाचे सर्व घडामोडींवर लक्ष आहे. विधानसभेचे अधक्ष्य या डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची हत्या करू शकत नाहीत. नैतिकतेच्या मुद्द्यावर, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा. उगाच टाळ्या वाजत बसू नये, असेही राऊत यावेळी म्हणाले.

'त्या' 16 आमदारांसंदर्भातही केलं भाष्य -"आता 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेल तर येऊ द्या. जर व्हिपच बेकायदेशी आहे, संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, मग विधानसभा अध्यक्षांनी त्या बेकायदेशीर प्रक्रियेवर आपली भूमिका घ्याला हवी. जर घटनेनुसार देश चालणार असेल, लोकशाहीनुसार चालणार असेल तर विधानसभा अध्यक्षांनी आपण संविधानाच्या बाजूने आहोत की, घटनाबाहाय्य बेकायदेशीर लोकांच्या बाजूने आहोत? हे बघायला हवे", असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय