शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची निवृत्ती घोषणा, काँग्रेसला वाटते वेगळीच शंका, मविआवर काय परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:57 IST

छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेपासून महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त ऐक्य असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नंतर नागपूर आणि सोमवारी मुंबईत झालेल्या सभेलादेखील मोठा प्रतिसाद मिळाला होता

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस असलेली अस्वस्थता आणि शरद पवार यांनी पद सोडण्याची केलेली घोषणा व त्यानंतरचा घटनाक्रम या सगळ्यांचा परिणाम महाविकास आघाडीच्या वज्रमुठीवर होण्याची शक्यता आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेपासून महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त ऐक्य असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नंतर नागपूर आणि सोमवारी मुंबईत झालेल्या सभेलादेखील मोठा प्रतिसाद मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे अधिक सख्य असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच आहे. 

शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष अधिक सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीमध्ये ज्या जोरदार हालचाली सुरू आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वासाठी आहेत की भविष्यात भाजपसोबत जाण्यासंदर्भात आहेत, याबाबत चित्र स्पष्ट नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधाची धार अधिक तीव्र केली  असली तरी  आपल्या लढ्यात राष्ट्रवादी नेहमीसाठी सोबत राहील का, याबाबत आता ठाकरे गटात शंकेचे वातावरण आहे.

काँग्रेस शंकेच्या वावटळीत, भाजपचे ‘वेट अँड वॉच’

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले, की राष्ट्रवादीबाबत शंकेचे वातावरण आहे. उद्या जर त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर आम्हाला नव्याने मोट बांधावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस आज महाविकास आघाडीसोबतच आहे; परंतु शरद पवार हे पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यावर कायम राहिले तर नवीन अध्यक्ष येतील ते भाजपसंदर्भात कोणती भूमिका घेतात हे अत्यंत महत्त्वाचे असेल आणि त्यावरच महाविकास आघाडीचे ऐक्य अवलंबून असेल. 

राष्ट्रवादीतील घडामोडीवर भाजपकडून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली आहे. केवळ निवडक नेत्यांनीच याबाबत भाष्य करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या निर्णयावर इतर पक्षाचे नेते काय म्हणतात?

आघाडीवर परिणाम होणार नाही - राऊतराष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला याचे विश्लेषण स्वतः शरद पवारच करू शकतात. हा निर्णय धक्कादायक वाटत असला तरी त्यात अनपेक्षित असे काही नाही, असे अलीकडच्या काही घटनांवरून वाटते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

आता बोलणे योग्य नाही - फडणवीसशरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्यांना भेटून जाणून घेऊ -पटोलेनेमक्या कोणत्या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे. त्यांना भेटू, सर्वकाही जाणून घेऊ मग यावर बोलणे योग्य ठरेल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस