शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातल्या ‘मारूती कांबळे’चे काय झाले? - राधाकृष्ण विखे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 22:34 IST

सत्तारूढ पक्षाने निवडणुकीपुर्वी दिलेली आणि आता विसर पडलेल्या आश्वासनांबाबत त्यांना आठवण करून देताना ‘मारूती कांबळेचं काय झालं’ प्रश्न आम्ही नेहमी विचारतो. सामना चित्रपटात शेवटी या प्रश्नाचे उत्तर मिळते.

पुणे - सत्तारूढ पक्षाने निवडणुकीपुर्वी दिलेली आणि आता विसर पडलेल्या आश्वासनांबाबत त्यांना आठवण करून देताना ‘मारूती कांबळेचं काय झालं’ प्रश्न आम्ही नेहमी विचारतो. सामना चित्रपटात शेवटी या प्रश्नाचे उत्तर मिळते. मात्र, राजकीय चित्रपटात या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. तसेच सिंहासन चित्रपटात दाखविण्यात आलेल्या आणि आजच्या राजकीय स्थितीत साम्य असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

पुणे नवरात्रो महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागु यांना विखे पाटील यांच्या हस्ते महर्षी पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर काँग्रसेचे नेते उल्हास पवार, मोहन जोशी, जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, दीपा लागु, रजनी वेलणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, सिलाईचे दादा गुजर, वास्तुविशारद महेश नामपुरकर, महोत्सवाचे आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल आदि उपस्थित होते.

सामना, सिंहासन, पिंजरा यांसह विविध चित्रपटांचा उल्लेख करून विखे पाटील म्हणाले, डॉ. लागु यांनी साकारलेल्या भुमिकांमुळे महाराष्ट्रातील रसिक समृध्द झाले आहेत. त्यांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आरूढ झाले आहे. देवाला रिटायर्ड करा, असे फक्त तेच म्हणू शकतात. इतर कोणी तसे धाडस करू शकणार नाही. इतिहास त्यांच्या उल्लेखाशिवाय लिहिला जाणार नाही. 

समोरच्या कलाकाराच्या चांगल्या कामाचे कौतुक करणारे कलावंत अभावानेच पाहायला मिळत असल्याची खंत ज्योती सुभाष यांनी व्यक्त केली. दीपा लागु, वेलणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आबा बागुल यांनी प्रस्ताविक केले.

... हे त्रास देतेय

आपण कुठल्या परिस्थितीत वावरतोय हे कळत नाही. आपण नाटक बघतोय आणि बाहेर कुणीतरी भगवान असे म्हणत भीक मागत आहे. त्याचवेळी कुणीतरी दया येवून त्याला भीक देत असेल. हे मला खुप त्रास देणारे आहे. यावर कुणी उपाय सांगितला तर तो मला हवाय. आपण घेतलेल्या व्रताचा भंग करत राहणे हे जणू कर्तव्य असल्यासारखे करत राहिलो आहे, असे सतत वाटते, अशी भावना डॉ. श्रीराम लागु यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस