शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

राज ठाकरे यांच्यासोबतच्या त्या १७ मिनिटांच्या बैठकीत काय घडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 5:15 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली.

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. सतरा मिनिटे ही बैठक झाली. त्यात प्रामुख्याने रेल्वे स्थानकांतील फेरिवाले हटवावेत, १५ दिवसात जर ते काम झाल नाही तर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. तसेच जे निवेदन दिले आहे त्यानुसार महिनाभरात प्रगती झाली नाही तर जे होइल त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, अशी तंबी ठाकरे यांनी दिली.

दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी बैठक सुरू झाली. त्यात प्रवासी संघटनांपैकी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे महासचिव अनिकेत घमंडी, उपाध्यक्षा लता अरगडे, विश्वनाथ धात्रक, कर्जतचे पंकज ओस्वाल, पश्चिम रेल्वेच्या झेडआरयूसीसीचे मेहुल व्यास यांना राज ठाकरेंनी रेल्वेच्या व्यथा मांडण्यास सांगितले. त्यानूसार प्रत्येकाने स्थानकांवरील विविध समस्यांवर झोड उठवण्यात आली.

आॅडीट समितीत रेल्वेने स्थानिक प्रवाशांना सामावून घेणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. त्याबद्दल संघटनांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ठाकरे यांनी तातडीने रेल्वे अधिकाºयांना जसा पत्रव्यवहार संघटना करतात तसा तुम्ही किती वेळा केला आहे. केवळ नोंदी करायच्या पुढे काही नाही असे का केले जाते. यापुढे हे सहन केले जाणार नाही हे स्पष्ट केले. महाव्यवस्थापक गुप्ता, शर्मा या दोघांनीही फेरिवाले तातडीने हटवले जातील पण जेथे स्कायवॉक आहेत त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांची जबाबदारी ढकलत असल्याचे निदर्शनास आणले, त्यावर ठाकरेंनी रेल्वेने त्यांची जबाबदारी पूर्ण करावी बाकी ठिकाणी आम्ही बघू असे स्पष्ट केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना