शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उद्धव ठाकरे व राहुल गांधींना शेतीतील काय समजते? ते विरोधच करणार; नारायण राणेंचा प्रहार

By देवेश फडके | Updated: January 7, 2021 15:18 IST

केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार; भाजप नेते नारायण राणे यांचा घणाघात

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना शेतीमधील काय कळते? नारायण राणेंचा सवालशेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, त्यात समेट घडून येणार नाही : नारायण राणेंचा दावाकेंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांचा हिताचा : नारायण राणेंचे मत

कणकवली : केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांवरील बहुतांश बंधने काढून टाकण्यात आली आहेत. या केंद्र सरकारचे काही चुकलेले नाही. दिल्ली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार, अशी जोरदार टीका भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली. कणकवली येथे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ते बोलत होते. 

केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यांच्या नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली येणे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित होते. ''मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत कृषी विधेयक सादर करण्यात आले तेव्हा त्यावर चांगली चर्चा झाली. विरोधकांपैकी कुणीही कृषी विधेयकाला विरोध दर्शवला नाही. याउलट अनेक विरोधक सदस्यांनी या विधेयकाचे कौतुकच केले. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसला संधी असून, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही केले नाही. आता विरोध करताहेत. आंदोलन करताहेत. शेतकऱ्यांवर बंधने लादणारे कायदे व नियम मोडीत काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले'', असे नारायण राण यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी या देशातील प्रमुख घटक आहे. शेतकऱ्यांना सबळ आणि आर्थिक आघाडीवर समृद्ध करणे, कष्टकऱ्याला केलेल्या श्रमातून फायदा मिळवून देणे, या दृष्टिकोनातून कृषी कायदा तयार करण्यात आला आहे, असे नारायण राणे यांनी यावेळी नमूद केले. आपला शेतकरी बांधव कष्टाने जे पिकवतो, उत्पादन घेतो. त्याचा जास्त मोबदला मिळेल, अशा ठिकाणी त्यांनी माल विकावा. योग्य मोबदला मिळालाचे समाधान शेतकऱ्याला लाभले पाहजे. माल कुठे विकायचा? कसा विकायचा? दलालांमार्फत विकायचा का? कष्टाचे पैसै मिळाले नाहीत, तर तोट्यात जाऊन विकायचा? अशी बंधने कृषी कायद्यामुळे दूर होणार आहेत. ही सर्व बंधने काढून टाकली तर मग काय चुकले? का आंदोलने केली जात आहेत? ही आंदोलने राजकीय असून, यात समेट घडून येईल, असे मला वाटत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेतीमधील काय समजते आणि शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला निघाले आहेत. आंदोलक शेतकरी ठराविक राज्यातील आहेत. आंदोलन करणारे बहुतांश दलाल आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Farmer strikeशेतकरी संपRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस