शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उद्धव ठाकरे व राहुल गांधींना शेतीतील काय समजते? ते विरोधच करणार; नारायण राणेंचा प्रहार

By देवेश फडके | Updated: January 7, 2021 15:18 IST

केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार; भाजप नेते नारायण राणे यांचा घणाघात

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना शेतीमधील काय कळते? नारायण राणेंचा सवालशेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, त्यात समेट घडून येणार नाही : नारायण राणेंचा दावाकेंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांचा हिताचा : नारायण राणेंचे मत

कणकवली : केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांवरील बहुतांश बंधने काढून टाकण्यात आली आहेत. या केंद्र सरकारचे काही चुकलेले नाही. दिल्ली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार, अशी जोरदार टीका भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली. कणकवली येथे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ते बोलत होते. 

केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यांच्या नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली येणे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित होते. ''मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत कृषी विधेयक सादर करण्यात आले तेव्हा त्यावर चांगली चर्चा झाली. विरोधकांपैकी कुणीही कृषी विधेयकाला विरोध दर्शवला नाही. याउलट अनेक विरोधक सदस्यांनी या विधेयकाचे कौतुकच केले. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसला संधी असून, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही केले नाही. आता विरोध करताहेत. आंदोलन करताहेत. शेतकऱ्यांवर बंधने लादणारे कायदे व नियम मोडीत काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले'', असे नारायण राण यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी या देशातील प्रमुख घटक आहे. शेतकऱ्यांना सबळ आणि आर्थिक आघाडीवर समृद्ध करणे, कष्टकऱ्याला केलेल्या श्रमातून फायदा मिळवून देणे, या दृष्टिकोनातून कृषी कायदा तयार करण्यात आला आहे, असे नारायण राणे यांनी यावेळी नमूद केले. आपला शेतकरी बांधव कष्टाने जे पिकवतो, उत्पादन घेतो. त्याचा जास्त मोबदला मिळेल, अशा ठिकाणी त्यांनी माल विकावा. योग्य मोबदला मिळालाचे समाधान शेतकऱ्याला लाभले पाहजे. माल कुठे विकायचा? कसा विकायचा? दलालांमार्फत विकायचा का? कष्टाचे पैसै मिळाले नाहीत, तर तोट्यात जाऊन विकायचा? अशी बंधने कृषी कायद्यामुळे दूर होणार आहेत. ही सर्व बंधने काढून टाकली तर मग काय चुकले? का आंदोलने केली जात आहेत? ही आंदोलने राजकीय असून, यात समेट घडून येईल, असे मला वाटत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेतीमधील काय समजते आणि शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला निघाले आहेत. आंदोलक शेतकरी ठराविक राज्यातील आहेत. आंदोलन करणारे बहुतांश दलाल आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Farmer strikeशेतकरी संपRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस