शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सरकार असूनही शिवसैनिकांना काय मिळालं?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 08:32 IST

जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. 

मुंबई - जे आले त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. त्यांची बांधिलकी मतदारसंघाशी आहे. मतदारसंघात काम करायची असेल तर निधी हवा. मतदारांना सामोरं जायचं आहे. त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री आपला होता तरीही अपेक्षेप्रमाणे कामं झाली नाहीत. निवडणुकीत चौथ्या नंबरवर शिवसेना गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यात शिवसैनिकांना काय मिळाले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. 

आमदार संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या शिवसैनिक मेळाव्यात शिंदे बोलत होते. मध्यरात्री १ च्या सुमारास रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. अधिकार असताना, सरकार असताना आम्हाला शिवसैनिकांना मदत करता आली नाही. बाळासाहेब म्हणाले होते, सत्तेत असताना शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागता कामा नये. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. मी माझ्या पक्षाशी काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेबांनी सांगितले होते. तेच बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गुवाहाटीत बऱ्याच लोकांच्या कलागुणांना वाव देणारं प्लॅटफॉर्म झालं होतं. संजय सिरसाट यांचं सगळं ओके आहे. औरंगाबादहून प्रवास करून सगळे इथे आलेत. मध्यरात्री दीड वाजता कुणाचा असा मेळावा झाला नसेल. आम्ही ऐतिहासिक घटना केली आणि तुमचा ऐतिहासिक मेळावा आहे. ज्या घडामोडी झाल्या ऐतिहासिक होत्या. त्यांची नोंद फक्त राज्याने नव्हे, देशाने नव्हे तर जगातही घेतली गेली. रोज टीव्हीवर एकनाथ शिंदे आणि त्यांची ५० माणसं दिसत होती. रोज एक-एक वाढत होती. ५० झाल्यावर बोललो आता थांबवूया आणि मुंबईत वाढवूया. दबावाने माणसानं नेली असा आरोप झाला. परंतु त्याठिकाणी सगळे स्वइच्छेने आले होते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला योग्य वेळ असते. आम्ही प्रयत्न खूप केले. जे आम्ही केले ते २०१९ च्या निकालानंतर व्हायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. त्यावेळीही आमचे आमदार आपण चुकीच्या मार्गाने चाललोय असं सांगत होते. सहा महिन्यातच आपल्याला कळू लागलं. जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले त्यांना काय तोंड देणार? असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना