शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सरकार असूनही शिवसैनिकांना काय मिळालं?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 08:32 IST

जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. 

मुंबई - जे आले त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. त्यांची बांधिलकी मतदारसंघाशी आहे. मतदारसंघात काम करायची असेल तर निधी हवा. मतदारांना सामोरं जायचं आहे. त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री आपला होता तरीही अपेक्षेप्रमाणे कामं झाली नाहीत. निवडणुकीत चौथ्या नंबरवर शिवसेना गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यात शिवसैनिकांना काय मिळाले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. 

आमदार संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या शिवसैनिक मेळाव्यात शिंदे बोलत होते. मध्यरात्री १ च्या सुमारास रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. अधिकार असताना, सरकार असताना आम्हाला शिवसैनिकांना मदत करता आली नाही. बाळासाहेब म्हणाले होते, सत्तेत असताना शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागता कामा नये. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. मी माझ्या पक्षाशी काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेबांनी सांगितले होते. तेच बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गुवाहाटीत बऱ्याच लोकांच्या कलागुणांना वाव देणारं प्लॅटफॉर्म झालं होतं. संजय सिरसाट यांचं सगळं ओके आहे. औरंगाबादहून प्रवास करून सगळे इथे आलेत. मध्यरात्री दीड वाजता कुणाचा असा मेळावा झाला नसेल. आम्ही ऐतिहासिक घटना केली आणि तुमचा ऐतिहासिक मेळावा आहे. ज्या घडामोडी झाल्या ऐतिहासिक होत्या. त्यांची नोंद फक्त राज्याने नव्हे, देशाने नव्हे तर जगातही घेतली गेली. रोज टीव्हीवर एकनाथ शिंदे आणि त्यांची ५० माणसं दिसत होती. रोज एक-एक वाढत होती. ५० झाल्यावर बोललो आता थांबवूया आणि मुंबईत वाढवूया. दबावाने माणसानं नेली असा आरोप झाला. परंतु त्याठिकाणी सगळे स्वइच्छेने आले होते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला योग्य वेळ असते. आम्ही प्रयत्न खूप केले. जे आम्ही केले ते २०१९ च्या निकालानंतर व्हायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. त्यावेळीही आमचे आमदार आपण चुकीच्या मार्गाने चाललोय असं सांगत होते. सहा महिन्यातच आपल्याला कळू लागलं. जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले त्यांना काय तोंड देणार? असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना