शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सरकार असूनही शिवसैनिकांना काय मिळालं?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 08:32 IST

जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. 

मुंबई - जे आले त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. त्यांची बांधिलकी मतदारसंघाशी आहे. मतदारसंघात काम करायची असेल तर निधी हवा. मतदारांना सामोरं जायचं आहे. त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री आपला होता तरीही अपेक्षेप्रमाणे कामं झाली नाहीत. निवडणुकीत चौथ्या नंबरवर शिवसेना गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यात शिवसैनिकांना काय मिळाले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. 

आमदार संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या शिवसैनिक मेळाव्यात शिंदे बोलत होते. मध्यरात्री १ च्या सुमारास रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. अधिकार असताना, सरकार असताना आम्हाला शिवसैनिकांना मदत करता आली नाही. बाळासाहेब म्हणाले होते, सत्तेत असताना शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागता कामा नये. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. मी माझ्या पक्षाशी काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेबांनी सांगितले होते. तेच बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गुवाहाटीत बऱ्याच लोकांच्या कलागुणांना वाव देणारं प्लॅटफॉर्म झालं होतं. संजय सिरसाट यांचं सगळं ओके आहे. औरंगाबादहून प्रवास करून सगळे इथे आलेत. मध्यरात्री दीड वाजता कुणाचा असा मेळावा झाला नसेल. आम्ही ऐतिहासिक घटना केली आणि तुमचा ऐतिहासिक मेळावा आहे. ज्या घडामोडी झाल्या ऐतिहासिक होत्या. त्यांची नोंद फक्त राज्याने नव्हे, देशाने नव्हे तर जगातही घेतली गेली. रोज टीव्हीवर एकनाथ शिंदे आणि त्यांची ५० माणसं दिसत होती. रोज एक-एक वाढत होती. ५० झाल्यावर बोललो आता थांबवूया आणि मुंबईत वाढवूया. दबावाने माणसानं नेली असा आरोप झाला. परंतु त्याठिकाणी सगळे स्वइच्छेने आले होते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला योग्य वेळ असते. आम्ही प्रयत्न खूप केले. जे आम्ही केले ते २०१९ च्या निकालानंतर व्हायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. त्यावेळीही आमचे आमदार आपण चुकीच्या मार्गाने चाललोय असं सांगत होते. सहा महिन्यातच आपल्याला कळू लागलं. जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले त्यांना काय तोंड देणार? असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना