शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या स्मार्ट सिटी योजनेचे काय ?

By admin | Updated: September 21, 2016 20:09 IST

स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश केलेल्या दहा शहरांपैकी केंद्रीय नगरविकास खात्याने राज्यातील पुणो आणि सोलापूर दोन शहरांची पहिल्या फेरीत निवड करून उर्वरीत आठ शहरांना ठेंगा दाखविला होता.

नारायण जाधवठाणे, दि. २१ : स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश केलेल्या दहा शहरांपैकी केंद्रीय नगरविकास खात्याने राज्यातील पुणो आणि सोलापूर दोन शहरांची पहिल्या फेरीत निवड करून उर्वरीत आठ शहरांना ठेंगा दाखविला होता. यानंतर देशभरातील 98 स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या जून मध्ये झालेल्या उद्घाटनाच्या चार दिवस अगोदर ठाणे, कल्याण-डोंबिवलीला एमएमआरडीए तर नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या शहरांना 2016-17 वर्षापासून सिडकोच्या पैशातून स्मार्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने अत्यंत घाईने घेतला होता.

या शहरांना केंद्र शासनाऐवजी एमएमआरडीए आणि सिडकोकडून प्रत्येकी 100 कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा तेव्हा केली होती. यातील 50 कोटी रूपये पहिल्या वर्षी देण्यात येणार होते. तर आर्थिक राजधानी मुंबई आणि तिची जुळ बहिण असलेल्या नवी मुंबई या दोन महापालिका आर्थिकदृष्या सक्षम असल्याने त्यांनी स्वबळावर स्वत:ची स्मार्ट सिटी योजना राबवावी, असे निर्देश नगरविकास विभागाने तेव्हा दिले होते. परंतु, आता केंद्र शासनाने सोमवारी जाहिर केलेल्या आपल्या यादीत ठाणो, कल्याण -डोंबिवली,नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांची निवड केल्याने राज्य शासनाने जून निवड केलेल्या यादीचे काय, त्यात सिडको आणि एमएमआरडीएकडून त्या त्या शहरांना मिळणा:या प्रत्येकी 100 कोटींच्या निधीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याशिवाय या यादीतून वगळलेल्या अमरावती व त्या यादीत स्वबळावर स्मार्ट करण्यास सांगितलेल्या मुंबई आणि नवी मुंबईचे काय याबाबत संबधित शहरांच्या अधिकारी आणि सत्ताधा:यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

देशभरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन पुणो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 जून 2016 रोजी झाले होते. त्याच्या चार दिवस आधीच राज्याच्य नगरविकास विभागाने अंत्यत घाईघाईने हा निर्णय घेतला होता. त्यावेळी संबधित महापालिकांतील लोकप्रतिनिधीही अंधारात असल्याचे सिद्ध झाले होते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणोच्या दुस:याच दिवशी नगरविकास विभागाने हा निर्णय घेतला होता. यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आठ महापालिकांनीही 15 संचालक असलेली एसपीव्ही अर्थात विशेष हेतू कंपनी स्थापन करावी, यात संबधित महापालिकेचे 6, महाराष्ट्र शासनाचे 4, केद्र शासनाचा 1 आणि दोन स्वतंत्र संचालकांचा समावेश करावा, असे याबाबतच्या आदेशात नगरविकास विभागाने म्हटले आहे. मात्र, महापालिकांनी नेमावयाच्या संचालकांमध्ये महापौर, स्थायी समिती सभाती सभापती, सभागृह नेता आणि विरोक्षी पक्ष नेत्यांसह संख्याबळानुसार उर्वरीत दोन संचालक नेमावेत असे निर्देश दिले होते.

विशेष हेतू कंपनी स्थापन्यासाठी केंद्राच्या निर्देशानुसार आवश्यक असलेल्या पाच लाख रूपयांच्या भाग भांडवलास मान्यता देण्यात आली होती. तसेच एखादा प्रकल्प राबवितांना राज्य शासन आणि महापालिकांचे भाग भांडवल समसमान 50 टक्के इतके राहणार होते. तसेच एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज घेतल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधित महापालिकांची राहणार असून 50 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा प्रकल्प राबवायचा झाल्यास त्यास केंद्र शासनाच्या उच्चाधिकार समितीची परवानगी बंधनकारक केले होते.

या आठ शहरांसाठी नगरविकास विभागाने आठ वरिष्ठ अधिका:यांना मार्गदर्शक म्हणून नेमले होते. तसेच त्या त्या शहरांचे पोलीस आयुक्त आणि स्थानिक जिल्हधि:यांचा समावेश असलेली उपसमिती त्यांना मदत करणार असल्याचे सांगितले होते. या आदेशांचे काय, याबाबत अद्याप राज्याच्या नगरविकास विभागाने स्पष्टीकरण दिलेले नाही.