शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नारायण राणेंसोबत फॉर्म भरायला गेले, बाहेर पडताच किरण सामंत म्हणाले, धनुष्यबाण असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 16:44 IST

Kiran Samant: रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये आज राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत किरण सामंतही उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढविण्याची तयारी करत होते. शिंदे गटात गेल्यानंतर अनेकदा निलेश राणेंना उमेदवारी मिळू नये म्हणून कधी व्हॉट्सअप स्टेटस तर कधी फेसबुकवर नाराजी व्यक्त करत होते. अशातच निवडणुकीची घोषणा झाल्यावरही सामंत बंधुंनी एवढे ताणून धरले की भाजपाला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार जाहीर करता येत नव्हता. अखेर सामंतांनी माघार घेतल्याचे जाहीर केले तेव्हा कुठे भाजपाचा जीव भांड्यात पडला आणि राणेंची उमेदवारी जाहीर झाली. 

रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये आज राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत किरण सामंतही उपस्थित होते. परंतु बाहेर येताच किरण सामंत यांनी पुन्हा रत्नागिरी सिंधुदूर्गमध्ये लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मतदान मिळालं असतं, असे सांगत आपली नाराजी वेगळ्या शब्दांत व्यक्त केली. 

महायुतीच्या नेत्यांनी यावर बोलू नये, अपशकून करू नये असे राणे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. ते किरण आणि उदय सामंत यांच्याबाबतच बोलले होते. नारायण राणेंना हा मतदारसंघ अवघड जाणार, धनुष्यबाण आणि शिवसेना यांचा कोकण बालेकिल्ला आहे. यामुळे इथे याच निशानीवरचा उमेदवार हवा, असे भाजपाच्या नेत्यांना सांगितल्याचे किरण सामंत म्हणाले होते. यावर राणेंची ही प्रतिक्रिया होती. 

महाराष्ट्रामध्ये 45 प्लस करण्याकरीता तसेच कुटुंबाशी चर्चा करून माघार घेतली आहे. मी नाराज नाही. या मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असते तर भरपूर मतदान मिळाले असते. भविष्यात सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. कोकणवासियांवर विश्वास आहे ते धनुष्यबाण कधीच विसरणार नाहीत, असे किरण सामंत म्हणाले. 

माझा हेतू स्वच्छ होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी राहणारच ते सहाजिकच आहे. भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याने सांगितले म्हणून मी उमेदवारी मागे घेतल्याच ट्विट डिलीट केले होते, असे किरण सामंत म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uday Samantउदय सामंतratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४