उद्योगनगरीत तुकोबारायांचे पालखीचे स्वागत
By Admin | Updated: June 20, 2014 22:40 IST2014-06-20T22:40:46+5:302014-06-20T22:40:46+5:30
आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचला पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले.

उद्योगनगरीत तुकोबारायांचे पालखीचे स्वागत
>पिंपरी: आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचला पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. महापौर मोहिनी लांडे, आयुक्त राजीव जाधव, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी, नगरसेवकांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत नामदेव भेटीचे शिल्प दिंडीप्रमुखांना देऊन गौरव केला.
पालखीच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज झाली होती. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात वारक:यांच्या स्वागतासाठी शहराच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाने पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मंडप उभारले होते. संतांची पालखी, वैष्णवांच्या मेळ्याचे आगमन हा नेत्रदीपक सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी पालखी मार्गाकडे आतुरतेने डोळे लावून नागरिक उभे होते. पाचच्या सुमारास ‘ग्यानबा-तुकाराम’ असा नामघोष कानी पडला. देहूरोडकडून निगडीच्या दिशेने पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना मावळतीच्या सूर्यकिरणांनी चकाकणारा चंदेरी पालखी रथ नजरेस पडताच सर्वाच्या नजरा त्याच दिशेने वळाल्या.
खांद्यावर भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, टाळ-मृदंगाच्या निनादात हरिनामाचा गजर करीत तल्लीन होऊन वारीची वाट चालणा:या वारक:यांच्या दिंडय़ा रथापुढे मार्गक्रमण
करीत होत्या.
भक्ती-शक्ती चौकात पालखी सोहळा दाखल होताच मोठी गर्दी झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली. रथ जवळ येताच नागरिक दर्शनासाठी पुढे येत होते. वारक:यांना फराळ देण्यासाठी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक सरसावले होते.
महापालिकेच्या कक्षात आमदार विलास लांडे, माजी महापौर आर एस कुमार, विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक रामदास बोकड, शमीम पठाण, मोरेश्वर भोंडवे, बाबा धुमाळ, अरुणा भालेकर, शांताराम भालेकर, नारायण बहिरवाडे आदी उपस्थित होते.
वारक:यांची सेवा घडावी, या उद्देशाने कोणी पाण्याची बाटली, तर कोणी फराळाचे पदार्थ, फळे वाटत होते. निगडी उड्डाणपुलावर पालखी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणो- मुंबई महामार्गावरील निगडीकडील वाहतूक काही काळ बंद ठेवली होती. भक्ती-शक्ती चौकातून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा आकुर्डीतील विठ्ठलवाडीत विसावला. शनिवारी सकाळी 6ला विठ्ठलवाडीतून पालखी मार्गस्थ होईल. खराळवाडीतील विठ्ठलमंदिराजवळ 8 च्या सुमारास विश्रंतीसाठी थोडा वेळ थांबून 12 ला दुपारची विश्रंती दापोडीत होईल. त्यानंतर पुण्याच्या दिशेने सोहळा मार्गस्थ होईल.