शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मास्क घाला, काेराेनासह विषाणूजन्य आजारांना पळवा; नागरिकांसाठी ठरतोय वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 01:13 IST

मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे.

आविष्कार देसाई

रायगड : काेराेनाचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी मास्क वापरण्याची सक्ती केली जात आहे. मास्क वापरल्याने काेराेनासारख्या महाभयंकर राेगला राेखता येते, तसेच अन्य विषाणूजन्य आजारापासून आपले संरक्षणही हाेत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे. त्यामुळे काेराेनासह अन्य राेगाला परतावून लावण्यासाठी मास्क वापरणे एक प्रकारे नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.
काेराेना विषाणूचा फैलावाने अख्या जगाला चांगलाच हादरा दिला आहे. काेट्यवधी नागरिकांना काेराेनाची लागण झाली, तर लाखाे नागरिकांचा काेराेनाेने बळी घेतला आहे. काेराेना विषाणूचा फैलाव हा नाका-ताेंडावाटे शरीरात हाेत असल्याने मास्कचा वापर करणे सरकारने बंधनकारक केले आहे. आराेग्य विभागही मास्क वापरणे गरजेचे असल्याचे सातत्याने सांगत आहे.

मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे. २०१९ या कालावधीत जिल्हा सरकारी रुग्णालयात ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर या कालावधीत सुमारे एक हजार २०० नागरिक उपचारासाठी आले हाेते, तर ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर, २०२० या कालावाधीत फक्त ४८0 नागरिक उपचारासाठी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळा
थंडीच्या दिवसामाध्ये प्रामुख्याने सर्दी, खाेकला, दमा, साथीचे ताप हे आजार डाेके वर काढतात. मात्र, काेराेनाच्या भीतीमुळे नागरिक मास्कचा वापर करत आहेत. त्यामुळे वातावरणातील विषाणूंना अटकाव केला जात आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येकाची प्रतिकारशक्ती तेवढीच महत्त्वाची आहे. यासाठी पाेषक आहार घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

विषाणूजन्य आजार
सर्दी, खाेकला, ताप, टीबी, दमा असे विविध विषाणूजन्य आजार आहेत, हे आजार हवेतून सहज पसरतात. नाका-ताेंडाला मास्क नसेल, तर ते मानवाच्या शरीरात प्रवेश करु शकतात. त्यामुळे संबंधिताला विषाणूजन्य आजाराची बाधा निर्माण हाेऊ शकते. यासाठी मास्क वापरणे हा खरच चांगला उपाय आहे. काेराेनाबराेबर अन्य विषाणूजन्य आजाराला राेखण्याचे प्रभावी हत्यार आहे.

थंडीच्या हंगामामध्ये प्रामुख्याने सर्दी, खाेकला, दमा, साथीचा ताप असे आजार डाेके वर काढतात. हे विषाणू हवेतून सहज पसरून मानवीच्या शरीरातमध्ये प्रवेश करतात. ज्यांची प्रतिकारशक्ती सक्षम असते, ते त्या विषाणूचा मुकाबला करतात. मात्र, अन्य जणांना या आजाराचा सामना करावा लागताे. मास्क वापरल्याने आजाराचा धाेका कमी असताे. -डाॅ. राजीव तांबाळे, जिल्हा रुग्णालय, रायगड

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस