शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

'विदर्भातले असलो तरी, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 17:19 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं पश्चिम महाराष्ट्राला आश्वासन

सातारा : मुख्यमंत्री आणि मी विदर्भातील असल्याने पश्चिम महाराष्ट्रावर विकासकामांमध्ये अन्याय होतो. मात्र हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. आम्ही विदर्भवाले पश्चिम महाराष्ट्रावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. सध्या सर्वात जास्त विकासकामे पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहेत,’ असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जलसंपदा विभागातर्फे येथे आयोजित केलेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.१९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर महाबळेश्वर येथे पहिली बैठक ठेवली होती. या बैठकीला मी आणि माझे सहकारी जायला निघालो, तेव्हा खंबाटकी घाटात टँकर उलटला होता. त्यामुळे तब्बल चार तास आम्हाला त्या घाटात अडकून पडावे लागले. महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेतली. या भागात बोगदा काढण्याचा प्रस्ताव मी या बैठकीत ठेवला होता. यासाठी मोठा खर्च होणार होता. तेव्हा एका बोगद्याचे काम केले. या घाटात दुहेरी वाहतुकीची व्यवस्था झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला, अशी आठवण गडकरींनी सांगितली.संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे चित्र डोळ्यांपुढे ठेवून आम्ही कामे करत आहोत. गेल्या चार वर्षांत ५ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्ट्रात सुरू केली आहेत. या कामांमध्ये अजिबात भ्रष्टाचार झालेला नाही. कंत्राटदाराने कुठल्याही कामासाठी मंत्री म्हणून मला भेटायची गरज नाही. रस्त्यांच्या कामांसोबतच जलसंवर्धनाचीही कामे सुरू आहेत. वाशीम, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांत सिंचनाबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. तो आता सातारा जिल्ह्यातही वापरण्यात यावा. नद्या-ओढ्यांचे खोलीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले. आम्ही विदर्भाचे म्हणून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करतो, असे म्हणणे कसे चुकीचे आहे, ते आम्ही दाखवून दिले आहे. पूर्वी जितकी कामे झाले नाहीत, तितकी कामे मोदी-फडणवीस सरकारांच्या काळात करून दाखवली आहेत. साखरेचे भरमसाठ उत्पन्न होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. ते सोडवण्यासाठी आता सरकार मध्यस्थी करणार नाही. साखरेचे उत्पादन बंद करून कारखान्यांनी हवी तेवढी इथेनॉल निर्मिती करावी, हे सर्व इथेनॉल ५५ रुपये लिटर दराने पेट्रोलियम मंत्रालय खरेदी करायला तयार आहे. वाहनांनाही आता १०० टक्के इथेनॉल वापरता येईल. त्यामुळे कारखान्यांनी वेळीच बदलावे, अन्यथा साखर कारखानदारी संपल्याशिवाय राहणार नाही, अशी भविष्यवाणीही गडकरी यांनी केली. यावेळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचे भूमिपूजन व धोम-बलकवडी धरणाच्या कालव्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा माधवी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVidarbhaविदर्भBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस