शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

'विदर्भातले असलो तरी, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 17:19 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं पश्चिम महाराष्ट्राला आश्वासन

सातारा : मुख्यमंत्री आणि मी विदर्भातील असल्याने पश्चिम महाराष्ट्रावर विकासकामांमध्ये अन्याय होतो. मात्र हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. आम्ही विदर्भवाले पश्चिम महाराष्ट्रावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. सध्या सर्वात जास्त विकासकामे पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहेत,’ असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जलसंपदा विभागातर्फे येथे आयोजित केलेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.१९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर महाबळेश्वर येथे पहिली बैठक ठेवली होती. या बैठकीला मी आणि माझे सहकारी जायला निघालो, तेव्हा खंबाटकी घाटात टँकर उलटला होता. त्यामुळे तब्बल चार तास आम्हाला त्या घाटात अडकून पडावे लागले. महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेतली. या भागात बोगदा काढण्याचा प्रस्ताव मी या बैठकीत ठेवला होता. यासाठी मोठा खर्च होणार होता. तेव्हा एका बोगद्याचे काम केले. या घाटात दुहेरी वाहतुकीची व्यवस्था झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला, अशी आठवण गडकरींनी सांगितली.संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे चित्र डोळ्यांपुढे ठेवून आम्ही कामे करत आहोत. गेल्या चार वर्षांत ५ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्ट्रात सुरू केली आहेत. या कामांमध्ये अजिबात भ्रष्टाचार झालेला नाही. कंत्राटदाराने कुठल्याही कामासाठी मंत्री म्हणून मला भेटायची गरज नाही. रस्त्यांच्या कामांसोबतच जलसंवर्धनाचीही कामे सुरू आहेत. वाशीम, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांत सिंचनाबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. तो आता सातारा जिल्ह्यातही वापरण्यात यावा. नद्या-ओढ्यांचे खोलीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले. आम्ही विदर्भाचे म्हणून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करतो, असे म्हणणे कसे चुकीचे आहे, ते आम्ही दाखवून दिले आहे. पूर्वी जितकी कामे झाले नाहीत, तितकी कामे मोदी-फडणवीस सरकारांच्या काळात करून दाखवली आहेत. साखरेचे भरमसाठ उत्पन्न होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. ते सोडवण्यासाठी आता सरकार मध्यस्थी करणार नाही. साखरेचे उत्पादन बंद करून कारखान्यांनी हवी तेवढी इथेनॉल निर्मिती करावी, हे सर्व इथेनॉल ५५ रुपये लिटर दराने पेट्रोलियम मंत्रालय खरेदी करायला तयार आहे. वाहनांनाही आता १०० टक्के इथेनॉल वापरता येईल. त्यामुळे कारखान्यांनी वेळीच बदलावे, अन्यथा साखर कारखानदारी संपल्याशिवाय राहणार नाही, अशी भविष्यवाणीही गडकरी यांनी केली. यावेळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचे भूमिपूजन व धोम-बलकवडी धरणाच्या कालव्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा माधवी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVidarbhaविदर्भBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस