आम्ही एकत्रच लढणार
By Admin | Updated: September 16, 2014 02:21 IST2014-09-16T02:21:40+5:302014-09-16T02:21:40+5:30
आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी परदेशातून परतल्यानंतर तीन-चार दिवसांत होईल.
आम्ही एकत्रच लढणार
कोल्हापूर : आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी परदेशातून परतल्यानंतर तीन-चार दिवसांत होईल. काही झाले तरी दोन्ही काँग्रेस एकत्रितपणो निवडणुकीला सामोरे जातील हे एकदा ठरले असल्याने जागा वाटपाबाबत फार अडचणी येणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यस्तरीय प्रचार प्रारंभ मंगळवारी येथे जाहीर सभेने होत आहे. त्यासाठी पवार कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत मोदी यांची लाट नव्हती व अशा अनेक लाटा मुंबईने आतार्पयत पाहिल्या असल्याचा निष्कर्ष भाजपाच्या सहयोगी पक्षाच्या नेत्यांनीच काढला आहे. त्यामुळे आम्ही तसे म्हणणार नाही. लोकसभेला जो निकाल महाराष्ट्रात लागला त्याची पुनरावृत्ती विधानसभेला होणार नाही. यापूर्वी 2क्क्4 ला केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात मात्र जनतेने काँग्रेस आघाडीच्याच हाती सत्ता दिली. तसेच यावेळीलाही होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
यांना कोण गांभिर्याने घेणार?
राज्यातील सरकारवर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व प्रकाश जावडेकर हे टीका करत आहेत. त्याला फार महत्व द्यायची गरज नाही. या नेत्यांची वक्तव्ये ग्रामीण भागातील जनताही फारशा गांभीर्याने घेत नाही, असेही पवार म्हणाले.
गळती नव्हे कारवाईची भीती
‘राष्ट्रवादी’ ला सर्वाधिक गळती लागल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर पवार म्हणाले,‘वस्तूस्थिती तशी नाही. जेवढे गेले, त्याहून जास्त आमदारांनी आजच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जे लोक सोडून गेले, त्यांनी कारभार सुधारावा अशा सूचना दिल्या होत्या़ परंतु तो सुधारला नसल्याने कारवाई होणार ही चाहुल लागल्यावर त्यांनी पक्ष सोडला आहे.’
‘सोशल’ बदनामी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल जी सोशल मीडियावरून बदनामी सुरु आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षातर्फे करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.