शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

बांधावर फिरून आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: October 29, 2022 14:25 IST

आदित्य व उद्धव ठाकरेंना लगावला टोला

नंदुरबार: शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे निर्णय शक्य ते सर्व निर्णय राज्य शासनाने घेतले असून अगदी कालपर्यंत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने मदत जाहीर केली आहे. असे असतांनाही काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर फिरून आरोप करीत आहेत. त्यांनी त्यांचे काम करावे असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे लगावला.

कुणी कितीही आरोप करो, सरकार आपले काम करीत राहील व लोकांना न्याय देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे बोलतांना केेले.नंदुरबार नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, २०१९ मध्ये युतीचे सरकार यायला पाहिजे होते, लोकांनी कल दिला, पण तसे झाले नाही. मात्र खऱ्या अर्थाने तीन महिन्यापूर्वी युतीचे सरकार सत्तेवर आले असून हे सरकार जनतेचे आहे, सर्वसामान्यांचे आहे, शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळेच आपण ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तेथे आपल्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळत आहे, असे ते म्हणाले.

नंदुरबार नगरपालिकेच्या इमारतीसाठी शासनाकडे बाकी असलेली सात कोटी २८ लाख रुपयांची रक्कम प्रास्ताविकात चंद्रकांत रघुवंशी यांनी मागणी करताच त्यांनी तेंव्हाच दूरध्वनीने नगरविकास विभागाला कळविले व त्यांचे भाषण सुरू होईपर्यंत त्याबाबतचा आदेशही शासनाने काढल्याचे जाहीर करून आपले सरकार आणि प्रशासनही गतीमान आहे याचा दाखला त्यांनी दिला. आपल्या भाषणातच त्यांनी शनिवार असतांनाही प्रशासनाने हा आदेश काढला आहे. त्यामुळे केवळ आश्वासने देणे, चालढकल करणे याववर आपला विश्वास नाही. जे आहे ते तात्काळ करावे हेच आपले धोरण असल्याने तीन महिन्यात आपण महाराष्ट्रातील लोकहिताचे अनेक अध्यादेश काढून जनतेला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे