शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

बांधावर फिरून आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: October 29, 2022 14:25 IST

आदित्य व उद्धव ठाकरेंना लगावला टोला

नंदुरबार: शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे निर्णय शक्य ते सर्व निर्णय राज्य शासनाने घेतले असून अगदी कालपर्यंत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने मदत जाहीर केली आहे. असे असतांनाही काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर फिरून आरोप करीत आहेत. त्यांनी त्यांचे काम करावे असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे लगावला.

कुणी कितीही आरोप करो, सरकार आपले काम करीत राहील व लोकांना न्याय देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे बोलतांना केेले.नंदुरबार नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, २०१९ मध्ये युतीचे सरकार यायला पाहिजे होते, लोकांनी कल दिला, पण तसे झाले नाही. मात्र खऱ्या अर्थाने तीन महिन्यापूर्वी युतीचे सरकार सत्तेवर आले असून हे सरकार जनतेचे आहे, सर्वसामान्यांचे आहे, शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळेच आपण ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तेथे आपल्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळत आहे, असे ते म्हणाले.

नंदुरबार नगरपालिकेच्या इमारतीसाठी शासनाकडे बाकी असलेली सात कोटी २८ लाख रुपयांची रक्कम प्रास्ताविकात चंद्रकांत रघुवंशी यांनी मागणी करताच त्यांनी तेंव्हाच दूरध्वनीने नगरविकास विभागाला कळविले व त्यांचे भाषण सुरू होईपर्यंत त्याबाबतचा आदेशही शासनाने काढल्याचे जाहीर करून आपले सरकार आणि प्रशासनही गतीमान आहे याचा दाखला त्यांनी दिला. आपल्या भाषणातच त्यांनी शनिवार असतांनाही प्रशासनाने हा आदेश काढला आहे. त्यामुळे केवळ आश्वासने देणे, चालढकल करणे याववर आपला विश्वास नाही. जे आहे ते तात्काळ करावे हेच आपले धोरण असल्याने तीन महिन्यात आपण महाराष्ट्रातील लोकहिताचे अनेक अध्यादेश काढून जनतेला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे