शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:26 IST

उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची हजेरी, यावेळी त्यांनी सोबत येण्याचे आवाहन केले.

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी आज तुमची साथ मागायला आलो आहे. तुम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहता. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. हा मेळावा नाही, बैठक आहे. मेळाव्यासाठी मैदान अपुरं पडेल. मी आपलं नातं मजबूत करण्यासाठी आलो आहे. आपण एकमेकांना हिंदू मानत असू, तर उत्तर भारतीय आणि मराठी वेगळे व्हायला नको,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. ते पुढे म्हणतात, 'गेल्या 25-30 वर्षांपासून आमची युती होती, आम्ही निभावली पण त्यांनी तोडली. आमची त्या पक्षासोबत आपुलकी होती, पण ते वर जाऊन बसले आणि त्यांनी आम्हाला दूर केले. 95 पूर्वी शिवसेना आणि भाजपला कुणी साथ देत नव्हते, आमच्यावर धार्मिक असल्याचा ठपका होता. तेव्हा माझ्या वडिलांनी तत्कालीन पंतप्रधनांना पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांनी कधीच उत्तर भारतीयांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष केला नाही. जो देशाच्या विरोधात होता, त्यालाच बाळासाहेबांनी विरोध केला.'

'आज आम्ही युती तोडली, कारण 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा युती तोडली. तेव्हा आम्ही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही हिंदूच राहू. आम्ही त्यांची साथ सोडली, पण आम्ही हिंदूत्व सोडले नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही. ते बोलणार आणि आम्ही ऐकणार, असं चालणार नाही. त्यांचे हिंदूत्व आम्ही मानायला तयार नाही. इतरांमध्ये भांडण लावून देण्याचे काम ते करतात आणि तशाप्रकारचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMumbaiमुंबई