शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रहित, अन्यायाविरोधात लढण्याच्या बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत - संजय राठोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 11:14 IST

बाळासाहेबांच्या विचारानं, त्यांनी जी शिकवण दिली त्याच पद्धतीनं भविष्याची वाटचाल आम्ही करणार, राठोड यांचं वक्तव्य. घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन.

नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे आहे. एका प्रकरणात आरोप झाल्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान, यानंतर गुरूवारी संजय राठोड यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं आणि त्यानंतर राजकीय परिस्थितीवर भाष्यही केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण शिवसेनेत आल्याचे राठोड म्हणाले.

“बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कॉलेज जीवनात आम्ही शिवसेनेत सहभागी झालो. खऱ्या अर्थानं कोणत्याही पदाची अपेक्षा मनात नव्हती. तेव्हा बाळासाहेबांचे विचारच मनात होते. राष्ट्रहित, अन्यायाच्या विरोधात लढणं त्यांचे विचार ऐकून आम्ही शिवसेनेत आलो. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही काम केलं. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांना आज पवित्र दिनी मंत्री झाल्यावर वंदन करावं म्हणून आज या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतलं,” असं संजय राठोड म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

“बाळासाहेबांच्या विचारानं, त्यांनी जी शिकवण दिली त्याच पद्धतीनं भविष्याची वाटचाल आम्ही करणार आहोत. आम्ही सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना वंदन केलं,” असंही ते म्हणाले. कोणीही आमदार नाराज नाही. आमच्या सर्व आमदारांची भूमिका एकच आहे. एकनाथ शिंदे हे आमचं नेतृत्व करत आहेत. आम्ही सर्व अधिकार त्यांना दिले आहेत. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार