शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राष्ट्रहित, अन्यायाविरोधात लढण्याच्या बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत - संजय राठोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 11:14 IST

बाळासाहेबांच्या विचारानं, त्यांनी जी शिकवण दिली त्याच पद्धतीनं भविष्याची वाटचाल आम्ही करणार, राठोड यांचं वक्तव्य. घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन.

नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे आहे. एका प्रकरणात आरोप झाल्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान, यानंतर गुरूवारी संजय राठोड यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं आणि त्यानंतर राजकीय परिस्थितीवर भाष्यही केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण शिवसेनेत आल्याचे राठोड म्हणाले.

“बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कॉलेज जीवनात आम्ही शिवसेनेत सहभागी झालो. खऱ्या अर्थानं कोणत्याही पदाची अपेक्षा मनात नव्हती. तेव्हा बाळासाहेबांचे विचारच मनात होते. राष्ट्रहित, अन्यायाच्या विरोधात लढणं त्यांचे विचार ऐकून आम्ही शिवसेनेत आलो. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही काम केलं. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांना आज पवित्र दिनी मंत्री झाल्यावर वंदन करावं म्हणून आज या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतलं,” असं संजय राठोड म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

“बाळासाहेबांच्या विचारानं, त्यांनी जी शिकवण दिली त्याच पद्धतीनं भविष्याची वाटचाल आम्ही करणार आहोत. आम्ही सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना वंदन केलं,” असंही ते म्हणाले. कोणीही आमदार नाराज नाही. आमच्या सर्व आमदारांची भूमिका एकच आहे. एकनाथ शिंदे हे आमचं नेतृत्व करत आहेत. आम्ही सर्व अधिकार त्यांना दिले आहेत. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार