शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

"आम्हाला भीती नाही"; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 20:10 IST

कुठलीही भीती आम्हाला नाही. कशाला आम्ही घाबरू असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना केला.

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गट आणि ठाकरे गट पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आले. सरकारविरोधात विरोधकांकडून अधिवेशनात ५० खोके, एकदम ओक्के अशाप्रकारे घोषणाबाजी दिली जाते. परंतु आज विधानसभेत वार्ड रचनेच्या विधेयकावर चर्चेत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. 

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, सभागृहात जो युक्तिवाद चाललाय तो कोर्टातही सुरु आहे. मी यावर भाष्य करणार नाही. परंतु आज एवढी घाई का आहे? जणू उद्याच निवडणुका लागल्या आहेत. काही जणांना निवडणुकांची भीती वाटते हे माहित्येय. सर्वकाही आपल्याला घटनाबाह्य करायचं का? हे सरकार घटनाबाह्य आहे. सुप्रीम कोर्टाचा सातत्याने अपमान करायचा असा आरोप त्यांनी केला. 

तर काही जण म्हणतात घटनेविरोधात सरकार स्थापन केलंय. दररोज सकाळी ९.३० वाजता सुप्रीम कोर्टात अर्ज द्यायला जायचे. हे थांबवा, ते थांबवा काय झालं? आम्ही बहुमताच्या नियमानुसार काम करतोय. या देशात घटना, नियम आहे. त्याविरोधात आम्ही गेलो नाही. त्याविरोधात आम्ही गेलो नाही. कधी जाणार नाही. कारण आमच्याकडे भक्कम बहुमत आहे आणि ते वाढत चालले आहे. त्यामुळे कुठलीही भीती आम्हाला नाही. कशाला आम्ही घाबरू असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना केला. दरम्यान, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे घटनेनुसार चालतं. आम्ही घटनाबाह्य काही केले नाही त्यामुळे सगळ्यांची अडचण झालीय. त्यामुळे वार्ड रचनेचे हे विधेयक लोकांच्या फायद्याचे आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

वार्ड रचनेबाबत होणार चौकशीमुंबई महापालिकेतील वार्ड रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. त्याचसोबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पालिकेतील गैरव्यवहारांची कॅगकडून कालबद्ध चौकशी करू अशी घोषणा करत एकप्रकारे सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली. विधानसभेत वार्ड रचनेवर विधेयक मांडण्यात आले. त्यावर चर्चा करताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यावर अनेक आरोप केले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर देत दर १० वर्षांनी जनगणना होते. त्यानुसार वार्ड वाढवले जातात. २० टक्क्यांच्या लोकसंख्येला ६ वार्ड वाढवले आणि ३.८ टक्के लोकसंख्या असताना ९ वार्ड वाढवले. ही विसंगती आहे. याबाबत ८९२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरे