शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; मुंबई, ठाण्यासह १८ जागांसाठी ठाकरे गट आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:31 IST

काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील असंही राऊतांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा तिढा नाही. राष्ट्रवादीला ज्या जागा हव्यात तिथे शिवसेना लढणार नाही. काँग्रेससोबतही काही जागांवर चर्चा आहे. फार कमी जागांवर शिवसेनेचा दावा आहे. तरीही आज एकत्र बसून चर्चा करू. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समिती बनवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होईल. त्यात आराखडा तयार होईल. जर या बैठकीत मतभेद झाले तर त्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची बैठक होऊल त्यात तोडगा निघेल. राज्यात ४८ जागा लोकसभेच्या आहेत. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ ही राज्ये २०२४ च्या निवडणुकीसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे महाराष्ट्र समर्थपणे पेलावे लागेल असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात सातत्याने २३ जागा लढत आलोय. आता कुणी काहीही म्हणत असलं तरी हे सत्य आहे. ३०-३५ वर्षाचे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. २०१९ ला शिवसेनेने १८ खासदार जिंकून आले होते. जिंकलेल्या व्यक्तीने पक्षांतर केले तरी मतदार पक्षांतर करत नाहीत. ज्यांनी आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान करतो तो गटाला मतदान करत नाही. त्यामुळे आम्ही जिंकलेल्या १८ जागा पक्क्या आहेत. छत्रपती संभाजीनगरची जागा थोड्या मताने पराभव झाला. मुंबई, ठाण्याच्या प्रामुख्याने जागा आहेत. मुंबई, ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील. या देशात ज्यारितीने हुकुमशाहीची राजवट सुरू आहे. त्यापेक्षाही भयंकर खूनी, दरोडेखोर, बलात्कारी यांना खुले समर्थन देणारी आणि त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था झुकवणारी अशा सरकारला या देशात आणि राज्यात राहू द्यायचे का आमच्यासमोरील महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे समर्थ पर्याय आम्ही जनतेला देत आहोत असं संजय राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, प्रत्यक्षात आम्ही टेबलावर बसून चर्चा करू त्यावेळी जागावाटपावर निर्णय होईल. आम्ही कोणत्या जागांवर दावा केलाय, कुठे लढणार हे जाहीरपणे बोलणार नाही. परंतु लोकांना कोण कुठे लढतोय हे माहिती असते. प्रत्येक पक्ष ४८ जागांची चाचपणी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सगळ्या ४८ जागांसाठी चाचपणी केलीय. त्यानंतर आम्ही २३ जागा पक्क्या केल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही ४८ जागांची चाचपणी केलीय. हे प्रमुख पक्ष राज्यातले आहेत. संघटन संपूर्ण राज्यात असते. जिल्ह्यातील, मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे मत ऐकले जाते असं संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस