शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; मुंबई, ठाण्यासह १८ जागांसाठी ठाकरे गट आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:31 IST

काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील असंही राऊतांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा तिढा नाही. राष्ट्रवादीला ज्या जागा हव्यात तिथे शिवसेना लढणार नाही. काँग्रेससोबतही काही जागांवर चर्चा आहे. फार कमी जागांवर शिवसेनेचा दावा आहे. तरीही आज एकत्र बसून चर्चा करू. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समिती बनवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होईल. त्यात आराखडा तयार होईल. जर या बैठकीत मतभेद झाले तर त्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची बैठक होऊल त्यात तोडगा निघेल. राज्यात ४८ जागा लोकसभेच्या आहेत. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ ही राज्ये २०२४ च्या निवडणुकीसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे महाराष्ट्र समर्थपणे पेलावे लागेल असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात सातत्याने २३ जागा लढत आलोय. आता कुणी काहीही म्हणत असलं तरी हे सत्य आहे. ३०-३५ वर्षाचे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. २०१९ ला शिवसेनेने १८ खासदार जिंकून आले होते. जिंकलेल्या व्यक्तीने पक्षांतर केले तरी मतदार पक्षांतर करत नाहीत. ज्यांनी आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान करतो तो गटाला मतदान करत नाही. त्यामुळे आम्ही जिंकलेल्या १८ जागा पक्क्या आहेत. छत्रपती संभाजीनगरची जागा थोड्या मताने पराभव झाला. मुंबई, ठाण्याच्या प्रामुख्याने जागा आहेत. मुंबई, ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील. या देशात ज्यारितीने हुकुमशाहीची राजवट सुरू आहे. त्यापेक्षाही भयंकर खूनी, दरोडेखोर, बलात्कारी यांना खुले समर्थन देणारी आणि त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था झुकवणारी अशा सरकारला या देशात आणि राज्यात राहू द्यायचे का आमच्यासमोरील महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे समर्थ पर्याय आम्ही जनतेला देत आहोत असं संजय राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, प्रत्यक्षात आम्ही टेबलावर बसून चर्चा करू त्यावेळी जागावाटपावर निर्णय होईल. आम्ही कोणत्या जागांवर दावा केलाय, कुठे लढणार हे जाहीरपणे बोलणार नाही. परंतु लोकांना कोण कुठे लढतोय हे माहिती असते. प्रत्येक पक्ष ४८ जागांची चाचपणी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सगळ्या ४८ जागांसाठी चाचपणी केलीय. त्यानंतर आम्ही २३ जागा पक्क्या केल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही ४८ जागांची चाचपणी केलीय. हे प्रमुख पक्ष राज्यातले आहेत. संघटन संपूर्ण राज्यात असते. जिल्ह्यातील, मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे मत ऐकले जाते असं संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस