शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; मुंबई, ठाण्यासह १८ जागांसाठी ठाकरे गट आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:31 IST

काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील असंही राऊतांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा तिढा नाही. राष्ट्रवादीला ज्या जागा हव्यात तिथे शिवसेना लढणार नाही. काँग्रेससोबतही काही जागांवर चर्चा आहे. फार कमी जागांवर शिवसेनेचा दावा आहे. तरीही आज एकत्र बसून चर्चा करू. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समिती बनवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होईल. त्यात आराखडा तयार होईल. जर या बैठकीत मतभेद झाले तर त्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची बैठक होऊल त्यात तोडगा निघेल. राज्यात ४८ जागा लोकसभेच्या आहेत. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ ही राज्ये २०२४ च्या निवडणुकीसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे महाराष्ट्र समर्थपणे पेलावे लागेल असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात सातत्याने २३ जागा लढत आलोय. आता कुणी काहीही म्हणत असलं तरी हे सत्य आहे. ३०-३५ वर्षाचे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. २०१९ ला शिवसेनेने १८ खासदार जिंकून आले होते. जिंकलेल्या व्यक्तीने पक्षांतर केले तरी मतदार पक्षांतर करत नाहीत. ज्यांनी आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान करतो तो गटाला मतदान करत नाही. त्यामुळे आम्ही जिंकलेल्या १८ जागा पक्क्या आहेत. छत्रपती संभाजीनगरची जागा थोड्या मताने पराभव झाला. मुंबई, ठाण्याच्या प्रामुख्याने जागा आहेत. मुंबई, ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील. या देशात ज्यारितीने हुकुमशाहीची राजवट सुरू आहे. त्यापेक्षाही भयंकर खूनी, दरोडेखोर, बलात्कारी यांना खुले समर्थन देणारी आणि त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था झुकवणारी अशा सरकारला या देशात आणि राज्यात राहू द्यायचे का आमच्यासमोरील महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे समर्थ पर्याय आम्ही जनतेला देत आहोत असं संजय राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, प्रत्यक्षात आम्ही टेबलावर बसून चर्चा करू त्यावेळी जागावाटपावर निर्णय होईल. आम्ही कोणत्या जागांवर दावा केलाय, कुठे लढणार हे जाहीरपणे बोलणार नाही. परंतु लोकांना कोण कुठे लढतोय हे माहिती असते. प्रत्येक पक्ष ४८ जागांची चाचपणी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सगळ्या ४८ जागांसाठी चाचपणी केलीय. त्यानंतर आम्ही २३ जागा पक्क्या केल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही ४८ जागांची चाचपणी केलीय. हे प्रमुख पक्ष राज्यातले आहेत. संघटन संपूर्ण राज्यात असते. जिल्ह्यातील, मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे मत ऐकले जाते असं संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस