शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:18 IST

भाजपा हा एकमेव कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे नेते उभे राहतात असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं

सांगली -  देवाभाऊंसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखे लढायला तयार आहे. माझा राजा जोपर्यंत गडावर जात नाही, तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि जीव सोडणार नाही असं बाजीप्रभू देशपांडे म्हणाले होते.  माझ्या भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असतात. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत ठामपणे आहे असं विधान गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले आहे. 

आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात इतकी कामे झाली परंतु जे काम देवेंद्र फडणवीसांना जमले ते दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्‍यांना जमले नाही. महाराष्ट्राला मिळालेला हा कोहिनूर हिरा आहे. जातीपलीकडे जाऊन हा माणूस जपला आहे. त्यांना टार्गेट करण्याचे काम केले जाते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात जातीवाद निर्माण होतो तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जाते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच भाजपा असा पक्ष ज्यात कार्यकर्ता मालक आहे. दुसरे पक्ष पाहा मुलायम सिंह- समाजवादी पार्टी, लालू प्रसाद यादव त्यांचा मुलगा वारस, बाळासाहेब ठाकरे त्यांचा मुलगा वारस, बारामतीकरांची पार्टी त्यांचे सगळे गणित माहिती आहे. हे ठरलेले आहे परंतु भाजपाचा उद्याचा अध्यक्ष कोण हे कुणीच सांगू शकत नाही. हा एकमेव कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे नेते उभे राहतात असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. 

हिंदूविरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचूनच काढणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव घेऊन चालत नाही तर त्या विचारावर चालावे लागते. रायगड किल्ल्याखालील छत्र निजामपूर गावाचे नाव १८ दिवसांत बदलण्याचं काम केले. १९८८ साली औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणणार असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ते नाव २०२२ मध्ये बदलण्यात आले. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केले तर काहींची झोप उडाली. जे हिंदूविरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचूनच काढले जाईल ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे असा इशारा देत गोपीचंद पडळकरांनी विरोधकांना इशारा दिला. 

"...तर दुष्काळ मिटला नसता"

आमच्या माण खटाव तालुक्याचा दुष्काळ देवाभाऊंनी हटवला. आम्ही शाळेत असताना नागनाथ नायकवडींची पाणी परिषद व्हायची. तासगाव, जत, खानापूर, कवठे महाकांळ, आटपाडी, कडेगाव, माण, खटाव, फलटण, कोरेगाव इतक्या सगळ्या तालुक्यातील लोक आटपाडीला येऊन पाणी परिषद व्हायची. कृष्णा नदीचे पाणी तुम्हाला द्यायचं आहे. आम्हाला प्रश्न पडायचा, आटपाडीतून भिवघाट चढल्यावर खानापूर येते. मग तिथून पुढे गेल्यानंतर आणखी एक डोंगर उतरला तेव्हा कृष्णा नदी येते. हे पाणी आम्हाला कसे मिळणार असा प्रश्न पडायचा. मात्र नागनाथ नायकवडींनी हे स्वप्न पाहिले आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते सत्यात उतरवले. दुष्काळी तालुक्यातील लोक देवाभाऊंना धन्यवाद देतात. जर २०१४ साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते तर दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ मिटू शकला नसता. आधी ५० कोटी, १५० कोटी खर्च करायचे. कंत्राटदार पैसे घ्यायचे. पंतप्रधान सिंचन योजनेतून ४९ हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आणि त्यातून देवेंद्र फडणवीसांनी दुष्काळ संपवण्याचं काम केले असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस