शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; फडणवीसांचं अतिशय सूचक विधान अन् चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:12 IST

शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं सूचक उत्तर

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्यामध्ये एक गुप्त भेट झाल्याची माहिती काल पुढे आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिल्लीतील भेट, त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर होत असलेले गंभीर आरोप या पार्श्वभूमीवर राऊत आणि शेलार यांच्या भेटीचं वृत्त आल्यानं चर्चेला उधाण आलं. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एक महत्त्वाचं विधान केलं.

आशिष शेलार आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. याबद्दल फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिवसेना आणि आमच्यात शत्रुत्व नाही. पण वैचारिक मतभेद आहेत, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. 'राऊत आणि शेलार यांच्या भेटीबद्दल मला काही कल्पना नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे,' असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.

'शिवसेना आणि भाजप यांच्यात शत्रुत्व नाही. मात्र आमच्यात वैचारिक मतभेद नक्कीच आहेत. शिवसेनेनं निवडणूक आमच्यासोबत लढवली. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेनं आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली, त्यांच्याच हात धरला. शिवसेना आणि आमच्यामध्ये वैयक्तिक स्वरुपाचा वाद नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत,' असं फडणवीस यांनी सांगितलं.

शिवसेनेनं पुन्हा हात दिला, तर त्यांना सोबत घेणार का, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात जर-तर असं काही नसतं, असं फडणवीस म्हणाले. राजकारणात जे जर-तर वर राहतात, ते केवळ स्वप्नच पाहतात, राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा सल्ला मी फडणवीसांना दिला होता, असं विधान आठवलेंनी केलं होतं. त्यावर आठवलेंनी योग्यवेळी योग्य सल्ला ऐकला असता, तर ते मुख्यमंत्री झाले असते, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतAshish Shelarआशीष शेलार