शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बळीराजाला दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 08:46 IST

अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत.

नांदेड :

अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत. त्यामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत, असे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.   

राज्याचे कृषिमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार हे पहिल्यांदाच नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. रविवारी पहाटे नांदेड तालुक्यातील कासारखेडा, नांदुसा येथे जात अतिवृष्टीने बाधित शेतीची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागीय आढावा बैठकीत त्यांनी  नुकसानाची  माहिती घेतली.  

या पाहणी दौऱ्याचा आढावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देऊन शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशन सुरू असल्याने बाहेर कोणतीही घोषणा करता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी निश्चितच समाधानाचे आणि आनंदाचे दिवस आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पीक विमा व इतर प्रश्नांच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविले जातील, असे सत्तार यांनी सांगितले. 

राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, कृषी, महसूल विभागांना उर्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वीच्या मदतीपेक्षा अधिकची मदत विद्यमान सरकारकडून करण्यात येईल. तसेच गेल्या वर्षीचे अनेकांचे अनुदान, नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळाली नसल्याची माहिती आमदारांकडून मिळाली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक निधी आणि प्रलंबित प्रस्ताव तत्काळ कृषी खात्याकडे पाठविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी