शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बळीराजाला दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 08:46 IST

अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत.

नांदेड :

अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत. त्यामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत, असे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.   

राज्याचे कृषिमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार हे पहिल्यांदाच नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. रविवारी पहाटे नांदेड तालुक्यातील कासारखेडा, नांदुसा येथे जात अतिवृष्टीने बाधित शेतीची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागीय आढावा बैठकीत त्यांनी  नुकसानाची  माहिती घेतली.  

या पाहणी दौऱ्याचा आढावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देऊन शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशन सुरू असल्याने बाहेर कोणतीही घोषणा करता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी निश्चितच समाधानाचे आणि आनंदाचे दिवस आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पीक विमा व इतर प्रश्नांच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविले जातील, असे सत्तार यांनी सांगितले. 

राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, कृषी, महसूल विभागांना उर्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वीच्या मदतीपेक्षा अधिकची मदत विद्यमान सरकारकडून करण्यात येईल. तसेच गेल्या वर्षीचे अनेकांचे अनुदान, नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळाली नसल्याची माहिती आमदारांकडून मिळाली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक निधी आणि प्रलंबित प्रस्ताव तत्काळ कृषी खात्याकडे पाठविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी