शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 06:18 IST

परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला.

मुंबई /पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात २.१२ टक्के वाढ झाली आहे. परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला.६,९८६ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ५८१ म्हणजेच ९४.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४० हजार ७९५ खासगी विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ९८८ (८५.७६%), तर ४५ हजार ०८३ पुनर्परीक्षार्थींमधून २२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी तनिषा बाेरामणीकर हिने ६०० पैकी ६०० गुण घेत बारावीच्या निकालात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तनिषाला लेखी परीक्षेत ६०० पैकी ५८२ गुण आणि खेळाचे १८ गुण असे एकूण ६०० गुण मिळाले. १०० टक्के घेणारी तनिषा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून एकमेव असल्याचेही स्पष्ट झाले.

नाउमेद होऊ नका; पुन्हा परीक्षेची तयारी करापुणे : बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन. जे विद्यार्थी यशस्वी झाले नाहीत त्यांनी नाउमेद हाेऊ नये. ही परीक्षा म्हणजे जीवनाची अंतिम परीक्षा नाही त्यामुळे निराश न हाेता पुढील परीक्षेसाठी चांगली तयारी करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले.यंदा प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेचे गुण ओएमआर शीटवर न घेता ऑनलाइन पोर्टलद्वारे घेतल्याने निकाल लवकर जाहीर करता आल्याचे ते म्हणाले.

मुंबईचा निकाल ३.८२ टक्क्यांनी वाढला तरी... इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागीय मंडळाचा बारावीच्या निकाल सर्वांत तळाला असला तरी त्यामध्ये ३.८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

गेल्या वर्षी ८८.१३% असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५% आहे.

यंदाही मुलींचीच बाजीराज्यात बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९५.४४, तर मुलांचे ९१.६० टक्के आहे. मुलींचा निकाल ३.८४ टक्के जास्त आहे.

विद्यार्थ्यांना किती गुण? ८,७८२     ९०% १,९०,५७०    ७५% ४,८०,६३१    ६०% ५,२६,४२५    ४५% १,३२,०५८    ३५ ते ४५% 

बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थीमुले : ७,६६,६५१उत्तीर्ण : ७,०२,२९६मुली : ६,५७,३१९उत्तीर्ण ६,२७,३८८

३१३ कॉपी प्रकरणांची नाेंद nपरीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी ३१३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक १४३ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर मंडळात घडली आहेत. nयासह १३९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लेखन केल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात २१ कनिष्ठ महाविद्यालये आणि संस्थांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. 

बारावीच्या निकालात कोकण विभाग राज्यात पहिला, तर मुंबई शेवटून पहिलाकोकण    ९७.५१ नाशिक    ९४.७१ पुणे    ९४.४४ कोल्हापूर    ९४.२४ छत्रपती संभाजीनगर    ९४.०८ अमरावती    ९३.०० लातूर    ९२.३६ नागपूर    ९२.१२ मुंबई    ९१.९५ 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी