शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:16 IST

अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले...

आमच्यावर नेहमीच आरोप केला जातो की, शिवसेनेने मराठी माणसाकरिता काय केले? माझे सरकार जर यांनी पाडले गेले नसते, तर सहाजिकच आहे की, मी या सर्व गिरणी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनाही घरे द्यायला सुरुवात केलीच होती. पण मुख्यतः गिरणी कामगारांना आणि पोलिसांनाही मुंबईत घरे दिली असती. पोलिसांना तर मिळत आहेतच. पण आणखीही दिली असती, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते  मुंबईत, आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षक आणि गिरणीकामगारांच्या आंदोलनाच्या मुद्द्यांवर पत्रकारासोबत बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षक आणि गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला घरे द्या, अशी मागणी करणारे गिरणीकामगार या दोघांचेही आंदोलन सुरू आहे. मला एका गोष्टीचे वैशम्य वाटले, "महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन इकडे सुरू आहे. लोकप्रतिनिधी इकजे आले आहेत. मात्र लोक वर्षानुवर्षे त्यांच्या व्यथा मांडत आहेत, ते मात्र आजाद मैदानात आंदोलन करत आहेत. 

ठाकरे पुढे म्हणाले, "शिक्षकांनाही आम्ही आश्वासन दिले आहे की, आम्ही तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत आहोत. गिरणी कामगारांचा तर प्रश्नच नाही. कारम गिरणी कामगारांचा संप तांत्रिकदृष्ट्या बघितलं, तर अजूनही सुरूच आहे. त्यावेळी गिरणी कामगारांच्या तोंडाला पाणे पुसण्यात आली. वन थर्ड, वन थर्ड, वन थर्ड हा जो काही प्रकार केला गेला, यामुले गिरणी कामगारांची घरे तर गेलीच. गिरण्यांच्या जमिनीही गेल्या. गिरण्यांच्या जागांवर टॉवर्स आणि मॉल्स उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून घाम गाळून ही मुंबई उभी केली, नव्हे संयुक्तमहाराष्ट्राच्या लढ्यात आंदोलन करून मिळवून दिली. तो गिरणी कामगार आज स्वतःच्याच मुंबईत बेघर झाला आहे."

"आज आमची हीच मागणी आहे की, एकीकडे गिरणी कामगार मुंबई बाहेर फेकला जातो. त्यांना शेलू-वांगडीला पाठवले जाते आणि दुसरीकडे आदानीला धारावीची जमीन दिली जात आहे. आमची आग्रहाची मागणी आहे की, गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या आणि आदानीची टॉवर्स शेलू-वांगडीला उभी करा. आदानीने देवनार डंपिंग ग्राउंडवर टॉवर्स बांधावेत किंवा त्यांना मिळालेला टी.डी.आर. शेलू-वांगडीला वापरावा. मात्र, ज्यांनी मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगारांना तेथे पाठवण्याऐवजी, त्यांना धारावीत घरे द्या. आदानीला कुर्ला मदर डेरीची जमीन दिली आहे, तिथे गिरणी कामगारांना घरे द्या. आणि अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना