शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:16 IST

अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले...

आमच्यावर नेहमीच आरोप केला जातो की, शिवसेनेने मराठी माणसाकरिता काय केले? माझे सरकार जर यांनी पाडले गेले नसते, तर सहाजिकच आहे की, मी या सर्व गिरणी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनाही घरे द्यायला सुरुवात केलीच होती. पण मुख्यतः गिरणी कामगारांना आणि पोलिसांनाही मुंबईत घरे दिली असती. पोलिसांना तर मिळत आहेतच. पण आणखीही दिली असती, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते  मुंबईत, आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षक आणि गिरणीकामगारांच्या आंदोलनाच्या मुद्द्यांवर पत्रकारासोबत बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षक आणि गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला घरे द्या, अशी मागणी करणारे गिरणीकामगार या दोघांचेही आंदोलन सुरू आहे. मला एका गोष्टीचे वैशम्य वाटले, "महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन इकडे सुरू आहे. लोकप्रतिनिधी इकजे आले आहेत. मात्र लोक वर्षानुवर्षे त्यांच्या व्यथा मांडत आहेत, ते मात्र आजाद मैदानात आंदोलन करत आहेत. 

ठाकरे पुढे म्हणाले, "शिक्षकांनाही आम्ही आश्वासन दिले आहे की, आम्ही तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत आहोत. गिरणी कामगारांचा तर प्रश्नच नाही. कारम गिरणी कामगारांचा संप तांत्रिकदृष्ट्या बघितलं, तर अजूनही सुरूच आहे. त्यावेळी गिरणी कामगारांच्या तोंडाला पाणे पुसण्यात आली. वन थर्ड, वन थर्ड, वन थर्ड हा जो काही प्रकार केला गेला, यामुले गिरणी कामगारांची घरे तर गेलीच. गिरण्यांच्या जमिनीही गेल्या. गिरण्यांच्या जागांवर टॉवर्स आणि मॉल्स उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून घाम गाळून ही मुंबई उभी केली, नव्हे संयुक्तमहाराष्ट्राच्या लढ्यात आंदोलन करून मिळवून दिली. तो गिरणी कामगार आज स्वतःच्याच मुंबईत बेघर झाला आहे."

"आज आमची हीच मागणी आहे की, एकीकडे गिरणी कामगार मुंबई बाहेर फेकला जातो. त्यांना शेलू-वांगडीला पाठवले जाते आणि दुसरीकडे आदानीला धारावीची जमीन दिली जात आहे. आमची आग्रहाची मागणी आहे की, गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या आणि आदानीची टॉवर्स शेलू-वांगडीला उभी करा. आदानीने देवनार डंपिंग ग्राउंडवर टॉवर्स बांधावेत किंवा त्यांना मिळालेला टी.डी.आर. शेलू-वांगडीला वापरावा. मात्र, ज्यांनी मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगारांना तेथे पाठवण्याऐवजी, त्यांना धारावीत घरे द्या. आदानीला कुर्ला मदर डेरीची जमीन दिली आहे, तिथे गिरणी कामगारांना घरे द्या. आणि अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना