शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांसाठीचे पाणी २० टक्क्यांनी महागणार!

By यदू जोशी | Updated: September 15, 2017 05:15 IST

महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.

 मुंबई : महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.प्राधिकरणाने वाढविलेल्या दरांचा बोजा स्थानिक स्वराज्य संस्थांवर पडेल आणि पर्यायाने तो ग्राहकांवर पडणार आहे.पाणीदर वाढल्याने लहानमोठ्या शहरांमधील पाणीपट्टीचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असलेल्या पालिकांना पाणीपट्टी (कर) वाढविण्याशिवाय पर्याय नसेल. त्यामुळे राज्यातील पाणी महागणार आहे.सध्या विविध प्रकारच्या पाणीपट्टीद्वारे जलसंपदा विभागाला दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळेल. सध्या विभागाला वार्षिक ६५० कोटी रुपये मिळतात. ते उत्पन्न वाढून ९५० कोटी रुपयांवर जाणार आहे. विभागाला वार्षिक १४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशा पद्धतीने पाणीदर निश्चित करण्याची विनंती विभागाने प्राधिकरणाला केली होती. मात्र प्राधिकरणाने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. या आधी २०११ मध्ये जलसंपदा विभागाने पाणीदर वाढविले होते. त्यानंतरच्या सात वर्षांत चलनवाढ ५४ टक्के झाली असली तरी पाणीदरातील वाढ सरासरी २० टक्केच करीत असल्याचे समर्थन प्राधिकरणाने केले आहे.उद्योगांसाठी सध्या १० हजार लिटरमागे ३० ते ६० रुपये पाणीदर जलसंपदा विभागाकडून आकारला जातो.तो आता ४० ते ८० रुपये करण्यात येणार आहे.महापालिका व नगरपालिकांच्या शहरांत घरगुती वापराच्या पाण्यावरील आकार हा २० टक्के वाढविला जाईल. सध्या १० हजार लिटरमागे १ ते २ रुपये आकारणी केली जाते.शेतीसाठीच्या पाण्याचे दर १६ टक्के वाढणार आहेत. ग्राम पंचायतींच्या गावांमध्ये पुरविण्यात येणाºया पिण्याच्या पाण्याचा दर १० हजार लिटरमागे ४० पैसे इतका आहे. तो कायम राहील.बीअर, मिनरल वॉटर महागणारऔद्योगिक वापराच्या पाण्याचे दर सध्या १० हजार लीटरमागे ३० ते ६० रुपये आहेत. ते ४० ते ८० रुपये केले जाणार आहेत. मात्र हे करताना बीअर आणि मिनरल वॉटर उद्योगांसाठीच्या पाण्याचे दर त्यापेक्षा पाच ते सहापट आकारण्यात येणार आहेत. याचा अर्थ या दोन्ही उद्योगांकडून २०० ते ४०० रुपये आकारणी केली जाईल.

टॅग्स :WaterपाणीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार