शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पालिकांसाठीचे पाणी २० टक्क्यांनी महागणार!

By यदू जोशी | Updated: September 15, 2017 05:15 IST

महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.

 मुंबई : महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.प्राधिकरणाने वाढविलेल्या दरांचा बोजा स्थानिक स्वराज्य संस्थांवर पडेल आणि पर्यायाने तो ग्राहकांवर पडणार आहे.पाणीदर वाढल्याने लहानमोठ्या शहरांमधील पाणीपट्टीचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असलेल्या पालिकांना पाणीपट्टी (कर) वाढविण्याशिवाय पर्याय नसेल. त्यामुळे राज्यातील पाणी महागणार आहे.सध्या विविध प्रकारच्या पाणीपट्टीद्वारे जलसंपदा विभागाला दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळेल. सध्या विभागाला वार्षिक ६५० कोटी रुपये मिळतात. ते उत्पन्न वाढून ९५० कोटी रुपयांवर जाणार आहे. विभागाला वार्षिक १४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशा पद्धतीने पाणीदर निश्चित करण्याची विनंती विभागाने प्राधिकरणाला केली होती. मात्र प्राधिकरणाने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. या आधी २०११ मध्ये जलसंपदा विभागाने पाणीदर वाढविले होते. त्यानंतरच्या सात वर्षांत चलनवाढ ५४ टक्के झाली असली तरी पाणीदरातील वाढ सरासरी २० टक्केच करीत असल्याचे समर्थन प्राधिकरणाने केले आहे.उद्योगांसाठी सध्या १० हजार लिटरमागे ३० ते ६० रुपये पाणीदर जलसंपदा विभागाकडून आकारला जातो.तो आता ४० ते ८० रुपये करण्यात येणार आहे.महापालिका व नगरपालिकांच्या शहरांत घरगुती वापराच्या पाण्यावरील आकार हा २० टक्के वाढविला जाईल. सध्या १० हजार लिटरमागे १ ते २ रुपये आकारणी केली जाते.शेतीसाठीच्या पाण्याचे दर १६ टक्के वाढणार आहेत. ग्राम पंचायतींच्या गावांमध्ये पुरविण्यात येणाºया पिण्याच्या पाण्याचा दर १० हजार लिटरमागे ४० पैसे इतका आहे. तो कायम राहील.बीअर, मिनरल वॉटर महागणारऔद्योगिक वापराच्या पाण्याचे दर सध्या १० हजार लीटरमागे ३० ते ६० रुपये आहेत. ते ४० ते ८० रुपये केले जाणार आहेत. मात्र हे करताना बीअर आणि मिनरल वॉटर उद्योगांसाठीच्या पाण्याचे दर त्यापेक्षा पाच ते सहापट आकारण्यात येणार आहेत. याचा अर्थ या दोन्ही उद्योगांकडून २०० ते ४०० रुपये आकारणी केली जाईल.

टॅग्स :WaterपाणीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार