शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

पालिकांसाठीचे पाणी २० टक्क्यांनी महागणार!

By यदू जोशी | Updated: September 15, 2017 05:15 IST

महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.

 मुंबई : महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.प्राधिकरणाने वाढविलेल्या दरांचा बोजा स्थानिक स्वराज्य संस्थांवर पडेल आणि पर्यायाने तो ग्राहकांवर पडणार आहे.पाणीदर वाढल्याने लहानमोठ्या शहरांमधील पाणीपट्टीचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असलेल्या पालिकांना पाणीपट्टी (कर) वाढविण्याशिवाय पर्याय नसेल. त्यामुळे राज्यातील पाणी महागणार आहे.सध्या विविध प्रकारच्या पाणीपट्टीद्वारे जलसंपदा विभागाला दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळेल. सध्या विभागाला वार्षिक ६५० कोटी रुपये मिळतात. ते उत्पन्न वाढून ९५० कोटी रुपयांवर जाणार आहे. विभागाला वार्षिक १४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशा पद्धतीने पाणीदर निश्चित करण्याची विनंती विभागाने प्राधिकरणाला केली होती. मात्र प्राधिकरणाने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. या आधी २०११ मध्ये जलसंपदा विभागाने पाणीदर वाढविले होते. त्यानंतरच्या सात वर्षांत चलनवाढ ५४ टक्के झाली असली तरी पाणीदरातील वाढ सरासरी २० टक्केच करीत असल्याचे समर्थन प्राधिकरणाने केले आहे.उद्योगांसाठी सध्या १० हजार लिटरमागे ३० ते ६० रुपये पाणीदर जलसंपदा विभागाकडून आकारला जातो.तो आता ४० ते ८० रुपये करण्यात येणार आहे.महापालिका व नगरपालिकांच्या शहरांत घरगुती वापराच्या पाण्यावरील आकार हा २० टक्के वाढविला जाईल. सध्या १० हजार लिटरमागे १ ते २ रुपये आकारणी केली जाते.शेतीसाठीच्या पाण्याचे दर १६ टक्के वाढणार आहेत. ग्राम पंचायतींच्या गावांमध्ये पुरविण्यात येणाºया पिण्याच्या पाण्याचा दर १० हजार लिटरमागे ४० पैसे इतका आहे. तो कायम राहील.बीअर, मिनरल वॉटर महागणारऔद्योगिक वापराच्या पाण्याचे दर सध्या १० हजार लीटरमागे ३० ते ६० रुपये आहेत. ते ४० ते ८० रुपये केले जाणार आहेत. मात्र हे करताना बीअर आणि मिनरल वॉटर उद्योगांसाठीच्या पाण्याचे दर त्यापेक्षा पाच ते सहापट आकारण्यात येणार आहेत. याचा अर्थ या दोन्ही उद्योगांकडून २०० ते ४०० रुपये आकारणी केली जाईल.

टॅग्स :WaterपाणीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार