शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

सिंचन घोटाळे टाळण्यासाठी जलसंपदा अन् कृषी एकसाथ

By admin | Updated: November 24, 2014 03:00 IST

राज्यातील जलसंपदा खात्यातील ७८ हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधव चितळे यांची समिती नेमल्यानंतर यापुढे असे प्रकार होऊ नयेत

नारायण जाधव, ठाणेराज्यातील जलसंपदा खात्यातील ७८ हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधव चितळे यांची समिती नेमल्यानंतर यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून सिंचनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्य शासनाने कृषी खात्याची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे़ यानुसार, राज्यात सिंचन क्षेत्रासह कृषी उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने जलसंपदा आणि कृषी विभागाची मिळून चारस्तरीय समन्वय समिती स्थापण्याचा उतारा राज्य शासनाने शोधला आहे़महाराष्ट्रात २०१३ अखेर ४०़७० लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे़ या सिंचन क्षमतेचा पूर्णपणे वापर करून पिकांचे उत्पन्नवाढीची गरज आहे़ राज्यात १९७४ ते १९९२पर्यंत लाभक्षेत्र प्राधिकरणामार्फत असे प्रयत्न करण्यात आले होते़ ही यंत्रणा २००० पर्यंत चालू होती़ त्याच व्यवस्थेला पुनर्जीवित करून अधिक व्यापक बनविण्याची शिफारस सिंचनविषयक विशेष चौकशी समितीने केली होती़ राज्यात कृषी विभागामार्फतही विविध पिकांच्या उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते़ परंतु, पाण्याअभावी अशा प्रयत्नांना मर्यादा येत आहेत़ यामुळे जलसंपदा आणि कृषी विभागात समन्वय असण्याचा सूर १० आॅक्टोबर २०१४ रोजी झालेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील कार्यशाळेत दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढला होता़ त्यानुसार, या समन्वय समितीची स्थापना करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने गेल्या मंगळवारी घेतला आहे़ यानुसार, तालुका व महसूल मंडळस्तर, जिल्हास्तर, विभागीयस्तर आणि राज्यस्तरीय समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत़ या समित्यांवर दोन्ही विभागांतील संबंधित अधिकाऱ्यांसह भूजलतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनीच गावपातळीपासून राज्यस्तरावर कृषी आणि जलसंपदा विभागांच्या कोणत्या प्रकल्पाची कोठे गरज आहे, सिंचन क्षमतेचा पूर्ण वापर होतो की नाही, यावर नियंत्रण ठेवायचे आहे़ तसेच रब्बी, उन्हाळी, हंगामापूर्वी बैठक घेऊन राज्यस्तरीय समितीने शासनाचे धोरण ठरवून तसा कार्यक्रम तिन्ही समित्यांना द्यावयाचा आहे़