शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

पाणीच पाणी... हानीच हानी..., राज्यात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा, विदर्भातही फटका, कोकणात संततधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 09:33 IST

Heavy Rain In Maharashtra News: गेले दोन दिवस राज्यात सर्वत्र पावसाचे धुमशान सुरूच असून मराठवाडचात अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून नांदेड शहराचा काही भाग जलमय झाला आहे. दरम्यान, शनिवारी पुन्हा राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई - गेले दोन दिवस राज्यात सर्वत्र पावसाचे धुमशान सुरूच असून मराठवाडचात अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून नांदेड शहराचा काही भाग जलमय झाला आहे. दरम्यान, शनिवारी पुन्हा राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात १३० मंडळांत अतिवृष्टी झाली असून २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. लातूर जिल्ह्यात ९१ तर नांदेड जिल्ह्यात १३२ मि.मी. रेकॉर्डब्रेक पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील सर्व नदी, नाल्यांना पूर आला. जिल्ह्यातील १६ पैकी १३ तालुक्यांमधील ६९ मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेडमध्ये शेकडो दुकाने, घरातही पाणी शिरले होते. गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी, या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.

वह्या-पुस्तके ठेवली वाळतनायगाव शहर परिसरात २८ ऑगस्टला आलेल्या पुरामुळे अनेक दुकानांमधील साहित्यासह घरांमधील शालेय साहित्यही भिजले. यामुळे जुन्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपळगावला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यात शाळकरी विद्यार्थ्यांची पुस्तके पाण्यात भिजल्याने त्यांनी चक्क पुस्तकांचेच असे वाळवण मांडले होते.

९० लाख हेक्टरवरील पिके धोक्यात अकोला: अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत आहेत. सर्वात जास्त पेरणी ८८ लाख २,०००-हेक्टरवर कापूस, सोयाबीनची पिके असल्याने ती धोक्यात आली आहेत. राज्यामध्ये यंदाच्या खरिपात १४२.७६ लाख हेक्टरवर सरासरीच्या ९९ टक्के पेरणी झाली आहे.१९२महसूल मंडळांमध्ये २९ ऑगस्टला ६५ मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी झाले आहे.१९८तालुक्यांत १ जून ते २९ ऑगस्टपर्यंत १००% पेक्षा अधिक पाऊस झाला. काही भागांत आठ-दहा दिवस मुसळधारची नोंद झाली.११७तालुके राज्यात असे आहेत, की जेथे ११७ टक्के पावसाची नोंद झाली. ३९ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के नोंद झाली. यामुळे पिके बुरशीजन्य रोगाला बळी पडत आहे. कापसासह इतर सर्वच पिकांची हीच अवस्था आहे.

लातूर, हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीलातूरमधील ३६ महसूल मंडळे, बीडमधील १६, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार मंडळांत अतिवृष्टीची झाली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर धरणाचे १४, तर इसापूर धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

पश्चिम वन्हाडात पिकांचे मोठे नुकसानवन्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा बसला. मूर्तिजापूरमध्ये एक महिला वाहून गेली. यवतमाळ जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असला तरी पाऊस पूर्णतः थांबलेला नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात १७ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.

 'सांगा साहेब... आम्ही आता जगायचं कसं? बियाण्यांचे कर्ज, खताची उथारी कशी फेडू? घर चालवायचं कसं? हा हंबरडा आहे मानोरा तालुक्यातील धनराज म्हातरमारे यांचा. २८ व २९ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी स्वरूपाच्या पावसाने त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरवले. म्हातरमारे यांच्या दोन एकर शेतात जोपासलेले सोयाबीन आणि तूरपिके काही दिवसांपूर्वी चांगल्या अवस्थेत होती. चांगल्या उत्पादनाचे स्वप्न रंगवत असतानाच नाल्याचे पाणी शेतात शिरले अन् काही तासांतच संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले.

टॅग्स :floodपूरRainपाऊसMarathwadaमराठवाडा