शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्यांना पाणी, पण स्थानिकांची मात्र पाण्यावाचून वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:31 IST

सरकारी व आरक्षणा खालील जमीनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका लागलीच नळ जोडण्या देते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - सरकारी व आरक्षणा खालील जमीनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका लागलीच नळ जोडण्या देते. पण स्वतःच्या मालकी जागेत राहणाऱ्या स्थानिकांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागते अशी परिस्थिती उत्तनच्या केशव सृष्टी जवळील खाडीवर भागातल्या स्थानिकांची झालेली आहे. 

भाईंदर पश्चिमेस उत्तनच्या केशवसृष्टी च्या पुढे असलेला खाडीवर म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. या भागातील स्थानिकांच्या जमिनी व घरे आहेत. गेल्या काही वर्षात येथील जमिनी बाहेरच्यांनी सुद्धा घेतल्या असून त्यांची देखील बांधकामे झाली आहेत. 

या भागात पालिकेने रस्ते, पथदिवे आदी सुविधा दिल्या आहेत. पालिका कर वसुली करते. पण केशवसृष्टी पर्यंत पाणी पुरवठा करणारी पालिका काही अंतरावरच असलेल्या स्थानिकांच्या घरांना पाणी मात्र आजही देण्याची नियत ठेवत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

एकीकडे सरकारी व पालिका आरक्षणातील जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना पालिका झटपट नळ जोडण्या देते. त्यासाठी काही दलाल वा नगरसेवक मध्यस्थ म्हणून अधिकाऱ्यांशी संधान साधून असतात. कागदपत्रे खोटी वा अपुरी असली तरी जोडण्या दिल्या जातात. खास जलवाहिन्या टाकल्या जातात. 

पण उत्तनच्या खाडीवर सारख्या मालकी जमिनीत घरे असलेल्या स्थानिकांना मात्र पाणी देण्यासाठी कमालीची उदासीनता व विविध कारणे दाखवली जातात. 

याभागात पालिकेने जलवाहिनीच टाकली नव्हती. जेणे करून येथील राहिवाश्यांना टँकरचे पाणी घ्यावे लागते. पिण्यासाठी महागडे पाणी विकत घ्यावे लागते. काहीजणांना तर पाण्यासाठी पायपीट करून पाणी आणावे लागते. 

स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर दोन वर्षांपूर्वी येथे पालिकेने जलवाहिन्या टाकल्या. स्थानिकांनी देखील नळजोडणी साठी पालिके कडे रीतसर अर्ज केले. परंतु आजही लोकांना नळ जोडण्या दिलेल्या नाहीत व पाणी सुद्धा पालिका देत नाही. जेणेकरून महापालिकेने स्थानिकांना पाण्या पासून वंचित ठेवल्याने त्यांची पाण्यासाठी वणवण कायम आहे.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक