शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अशी केली माढाने बारामतीवर सरशी ;जाणून घ्या पडद्यामागच्या घडामोडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:29 IST

नीरा देवघरच्या पाण्यावरुन बारामती आणि माढा लोकसभा मतदार संघातील नेत्यांची सुरु असलेल्या रस्सीखेची मधे अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी  बाजी मारत बारामतीतून नीरेचे पाणी पळवून नेले.

पुणे : नीरा देवघरच्या पाण्यावरुन बारामती आणि माढा लोकसभा मतदार संघातील नेत्यांची सुरु असलेल्या रस्सीखेची मधे अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी  बाजी मारत बारामतीतून नीरेचे पाणी पळवून नेले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोचलेले कान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली शिष्टाई अपुरी पडली. भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आपले राजकीय वजन वापरत सोलापूरच्या पारड्यात नीरेचे संपूर्ण पाणी टाकण्यात यश मिळविले. आघाडी सरकारच्या काळात २००७साली नीरा कालवा पाणी वाटप करार करण्यात आला. नीरा उजवा कालव्याचे काम अपूर्ण असल्याने नीरा डावा कालव्याला या धरणातील ६० टक्के आणि उजवा कालव्याला चाळीस टक्के पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. डावा कालव्याद्वारे बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्याला पाणी मिळते. तर, उजवा कालव्याद्वारे माढा मतदार संघातील माळशिरस, फलटण आणि सांगोला भागाला पाणी मिळते. त्यातही माळशिरस आणि फलटणला त्याचा फायदा अधिक होतो. हा करार २०१७ साली संपुष्टात आला. जलसंपदा विभागाने राज्य सरकारला पुर्वीच्या करारास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बारामतीला बेकायदेशीर पाणी दिले जात असल्याचा दावा करीत पुर्वीच्या कराराला मुदतवाढ देऊ नये अशी मागणी सरकारकडे केली. तसेच, जलसंपदा मंत्र्यांनी देखील करार बदलाचे संकेत दिले होते. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, कोणत्या प्रश्नावर राजकारण करताय असा सवाल उपस्थित करीत सरकारचे कान देखील टोचले होते. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार निंबाळकर यांनी १० जूनला सिंचनभवन येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र भेट घेतली. आपापल्या मतदारसंघातील पाणी प्रश्नावर चर्चा केली. सुळे यांनी तर, नीरा देवघर धरणातील पाणी बंद पाईपलाईन मधून नेण्याचे सर्वेक्षण सुरु करण्याची मागणी देखील केली होती. त्यामुळे कोणकोणत्या ग्रामपंचायतींना फायदा होईल, याचा ताळेबंदही मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर नीरा-देवघरच्या पाण्यावर काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागले होते. सरकारने खासदार निंबाळकर यांची बाजू उचलत त्यांना ‘जल’बळ देऊ केले आहे. त्यामुळे तूर्तास तरी माढाने बारामतीवर सरशी केल्याचे चित्र आहे.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारWaterपाणीBaramatiबारामतीmadha-pcमाढाPoliticsराजकारण