शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

‘लोकमत’ जलमित्र अभियानाने जलसंवर्धनाचा संकल्प पूर्ण!

By admin | Updated: July 31, 2016 03:57 IST

‘लोकमत’ने राबविलेल्या ‘जलमित्र’अभियानास प्रतिसाद देत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘जलवर्धन’ ही संस्था स्थापन केली.

राम देशपांडे,

अकोला- ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘जलमित्र’अभियानास प्रतिसाद देत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘जलवर्धन’ ही संस्था स्थापन केली. पावसाचा प्रत्येक थेंब संकलित करून या संस्थेने जलसंवर्धनाचा संकल्प पूर्ण केला आहे.उन्हाळ्यात संपूर्ण जिल्हा पाणीटंचाईने होरपळून निघाला. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व जलजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र’अभियान राबविले. या अभियानातून प्रेरणा घेत शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ‘जलवर्धन’ ही संस्था स्थापन केली. रोटरी क्लब अकोलाचे प्रांताध्यक्ष डॉ. निखिल किबे व डॉ. सीमा तायडे यांच्या पुढाकाराने उदयास आलेल्या या संस्थेने ‘रेन वॉटर’ व ‘रूफ वॉटर हार्वेस्टिंग’साठी केवळ जनजागृतीच नव्हे, तर अनेक इमारतींवर प्रत्यक्ष कृतीतून ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली.मोठी मैदाने, रस्त्यांवरील वाहून जाणारे पाणी संकलित करण्यासाठी संस्थेच्यावतीने आदर्श कॉलनी व भारत विद्यालयासमोरील मैदानासह विविध भागातील खुल्या भूखंडांवर जेसीबीद्वारे चर खोदून त्यात शोषखड्डे तयार केले असून त्यात आतापर्यंत झालेल्या पावसाचे पाणी मुबलक प्रमाणात जमा झाले आहे.विशेष म्हणजे ज्या-ज्या भागात संस्थेच्यावतीने जलपुनर्भरणाची कामे करण्यात आली, त्या सर्व भागात जमिनीखाली किमान दोन ते दहा फुटांवर अंतरावर पाण्याचे झरे लागत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. >‘लोकमत’च्या ‘जलमित्र’ अभियानातून प्रेरणा घेऊन ‘जलवर्धन’ स्थापन करण्याची कल्पना सूचली. पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जलजागृती व प्रत्यक्ष कृती या विचाराने संस्था काम करीत आहे. भविष्यात याचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास वाटतो. - डॉ. निखिल किबे,प्रांतपाल, रोटरी क्लब, अकोला