शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

सागरी किनाऱ्यांवर ९१ चेक पोस्टवरून वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 5:17 AM

२६/११च्या हल्ल्यातील कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व साथीदारांची सागरी मार्गे मुंबईत एन्ट्री

राजेश निस्ताने मुंबई : २६/११च्या हल्ल्यातील कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व साथीदारांची सागरी मार्गे मुंबईत एन्ट्री झाल्यानंतर पोलिसांनी गेल्या काही वर्षांपासून सागरी किनाºयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. सुरक्षेसाठी दरवर्षी नवनवीन उपाययोजना व आणखी दक्ष राहण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे.सागरी किनाºयांच्या सुरक्षेत कोणतीही कसर राहू नये म्हणून केंद्र शासन व तटरक्षक दलाकडून सागरी पोलीस ठाण्यांना वेळोवेळी मदत केली जाते. पोलिसांना बोटीद्वारे सागरी गस्त घालता यावी म्हणून केंद्र शासनाकडून २८ व राज्याकडून २९ अशा ५७ नव्या वेगवान बोटी पुरविल्या जाणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना याचे वाटप केले गेले आहे.जुन्या १० बोटींसह ६७ बोटींनी तसेच सागरी किनाºयालगतच्या परिसरात जीप, मोटारसायकल व पायी गस्त केली जात आहे. जुन्या २५ सागरी पोलीस ठाण्यांमध्ये १२ नवीन ठाण्यांची भर घातली गेली. आता ४४ सागरी पोलीस ठाणी कार्यरत आहेत. जुने ५९ व नव्या ३२ अशा ९१ सागरी चेक पोस्ट कार्यरत आहेत. सुरक्षेची साधनसामग्री व उपकरणे ठेवण्यासाठी पोलिसांकरिता आॅपरेशनल रूमचे बांधकाम केले गेले आहे.१७६९ पोलिसांची वानवासागरी पोलीस ठाण्यांसाठी ४३६८ पोलीस - अधिकाºयांची पदे मंजूर असली तरी सध्या २५९९ एवढेच कार्यरत आहेत. १७६९ मनुष्यबळाची अजूनही वानवा आहे.साडेसातशे तांत्रिक कर्मचाºयांची कमतरतावेगवान बोटी चालविण्यासाठी तांत्रिक पोलीस कर्मचाºयांची १००४ पदे निर्माण करण्यात आली असली तरी त्यापैकी केवळ ३४९ कर्मचारी कार्यरत आहेत.मच्छीमारांच्या १४ हजार बोटीसागरी किनाºयावर मच्छीमारांच्या १४ हजार २२२ बोटींची नोंद करण्यात आली आहे. ओळख होण्यासाठी जिल्हानिहाय सांकेतिक रंग निश्चित करण्यात आले असून, १३ हजार ९६६ या बोटींचे कलर कोडिंग करण्यात आले आहे. याशिवाय १ लाख ८० हजार ८५६ मच्छीमार बांधवांना बायोमेट्रिक कार्डचे वाटप करण्यात आले.