शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वाशिम: तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची ‘होळी ’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 14:18 IST

नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लुट होत असल्याचा आरोप, हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने

वाशिम: नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लुट होत असल्याचा आरोप करीत हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मालेगाव तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची होळी करण्यात आली. 

यावर्षी शेतक-यांना विविध संकटातून जावे लागत आहे. खरिपात पावसात सातत्य नसल्याने तसेच शेंगा धरण्याच्या ऐन कालावधीत पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. आता सोयाबीनला हमीभावदेखील मिळत नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट होत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला. नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी सुरु केल्यास शेतक-यांना ३०५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार  आहे .परंतु मालेगाव येथे नाफेडची खरेदी बंद असल्याने व्यापारी १८०० ते २२०० रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करीत आहेत. यामुळे नाफेडने सोयाबीन खरेदी २ दिवसात सुरु करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली. तसेच सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे त्वरीत अदा करण्याची मागणीदेखील करण्यात आली. या  मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोयाबीनची होळी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश आंधळे, जिल्हा मार्गदर्शक दत्ता जोगदंड, युवा आघाडीचे शहराध्यक्ष योगेश काळे, जिल्हा संघटक ओम गायकवाड, गजानन बाजड, सुभाष बाजड, श्रीकांत शेवाळे, एकनाथ महाजन, सदाशिव भोयर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी