शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं झुगारला विमा कंपनीचा दबाव; वाचवले 111 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:22 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तप्तरता; विमा कंपनीचा दबाव झुगारला, जनतेच्या पैशांच्या अनाठायी खर्चात झाली मोठी बचत

- योगेश बिडवई मुंबई : राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा फेब्रुवारीपासूनच्या नव्या वर्षाचा प्रीमिअम नॅशनल इन्शूरन्स कंपनीकडून कमी करून घेण्यात यश आल्याने सरकारचा या योजनेचा खर्च १११ कोटी रुपयांनी कमी होणार आहे. विशेष म्हणजे प्रीमिअम कमी होऊ नये यासाठी कंपनीच्या उच्च पदस्थांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. मात्र अधिकाऱ्यांनी ते हाणून पाडले.ही योजना राज्य आरोग्य सोसायटी या स्वतंत्र संस्थेतर्फे चालविली जाते. आरोग्य विमा देणाºया कंपनीशी वाटाघाटी करून कंपनीने आधी ठरवलेला प्रती वर्ष प्रती कुटुंब प्रीमिअम ६९० रुपयांवरून ६४० रुपये एवढा कमी करून घेण्यात आला आहे.यामुळे प्रीमिअमपोटी विमा कंपनीला १११ कोटी ९१ लाख रुपये कमी द्यावे लागतील. ही योजना सुरू झाली तेव्हा प्रीमिअमचा हा दर ३३३ रुपये होतो, तो कंपनीने हळूहळू वाढवत ६९० रुपयांवर नेला होता. प्रत्यक्ष योजना राबविताना बनावट क्लेम, प्रकरणांतील अनियमितता इत्यादी शक्यता लक्षात घेऊन हा प्रीमिअम ठरवला जातो, असे कंपनीचे म्हणणे होते. मात्र असे गैरप्रकार रोखण्याची चोख व्यवस्था आम्ही केलेली असल्याने या शक्यतांचे कारण देऊन प्रीमिअम वाढविणे असमर्थनीय आहे, असे पटवनू दिल्यानंतर विमा कंपनी प्रीमिअम कंपनी करण्यास राजी झाली.राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे व त्यांच्या टीमने यासाठी पद्धतशीर ‘प्रेझेंटेशन’ तयार करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. खरतर शिंदे सुटीवर परदेशात गेले होते. मात्र हे काम फेब्रुवारीच्या आत करणे आवश्यक आहे, ही निकड लक्षात घेऊन कुटुंबास परदेशात ठेऊन ते परत आले. सरकारी काम मन लावून केले तर जनतेचा अनाठायी खर्च होणारा पैसा वाचविता येतो, हेच यावरून दिसून येते. योजनेचा खर्च वाचविण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी शिंदे यांनी दिलेल्या प्रीमिअममधील ८१ कोटी रुपये परत मिळविले होते.वैद्यकीय सुविधांसाठी १९३ कोटी उपलब्धप्रीमिअमपोटी वाचणारे व प्रसिद्धीचा खर्च न केल्याने परत मिळविण्यात आलेले, असे एकूण १९३ कोटी ६९ लाख रुपये सहा महिन्यांत वाचविण्यात डॉ. सुधाकर शिंदे यांना यश मिळाले आहे. हे पैसे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा व इतर शासकीय रुग्णालयांच्या पायाभूत वैद्यकीय सुविधांसाठी उपलब्ध होणार आहेत. अनेक रुग्णालयांना अत्याधुनिक उपकरणे घेणेही त्यातून शक्य होईल.योजनेची जाहिरात व प्रसिद्धी करण्यासाठी प्रीमिअमच्या दोनटक्के म्हणजे ८१ कोटी ७८ लाख रुपये विमा कंपनीने अतिरिक्त घेतली होती. मात्र कंपनीने प्रत्यक्षात त्या प्रमाणात जाहिरात व प्रसिद्धी केली नाही, असे सोसायटीने निर्दशनास आणले. आणि अवास्तव रक्कम परत करावी, अशी मागणी केली. बरीच घासाघीस केल्यानंतर कंपनीने अखेर हप्त्यांमध्ये ती रक्कम परत केली. त्याचा शेवटचा धनादेश १५ डिसेंबरला आला.प्रीमिअम कमी करून घेणे, हे अत्यंत अवघड काम होते. मात्र आमच्या सर्व टीमने पारदर्शक व संगणकीकृत कामामुळे काही महिन्यांपासून गैरप्रकार रोखले. त्याची सर्व माहिती आम्ही कंपनीला दिली. प्रीमिअम कमी करण्यावर आम्ही अडूनच बसलो होतो. जनतेचा पैसे वाचविल्याचे मोठे समाधान आहे.- डॉ. सुधाकर शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य सोसायटी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र