शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेतीन हजार रुग्ण प्रतीक्षेत, अवयवदानाविषयी गैरसमज दूर करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:17 IST

अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते.

 - स्नेहा मोरेमुंबई : अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते. अवयवदानाविषयी जनजागृती होऊनही सध्या मुंबईतील जवळपास ३ हजार ५०० हून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत. त्यामुळे अजूनही अवयवदानाविषयी जनजागृतीसह त्याविषयीचे गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.दरवर्षी २.१ लाख भारतीयांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, मात्र प्रत्यक्षात केवळ ३000-४000 मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. हृदय प्रत्यारोपणाच्या बाबतीतही परिस्थिती काही वेगळी नाही. देशभरात दरवर्षी ४ ते ५ हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना, केवळ १00 लोकांचे हृदय प्रत्यारोपण होऊ शकते. सध्या मुंबईत एकूण २५ रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत, तर यकृत प्रत्यारोपणासाठी २६५, फुप्फुसासाठी पाच ते सहा व्यक्ती प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक ऊर्मिला महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली.अवयवदात्यांची कमतरता ही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील प्रमुख समस्या आहे. जागरूकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुºया पायाभूत सुविधा यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे, असे मत अवयवदान चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत आपटे यांनी व्यक्त केले. एका व्यक्तीने अवयवदान केले तर आठ जणांना नवसंजीवनी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक लोकांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.दाता कार्ड ही औपचारिकतातुमची अवयवदान करण्याची इच्छा आहे हे सांगण्यासाठी दाता कार्डवर स्वाक्षरी करणे ही पहिली पायरी आहे. दाता कार्ड हे कायदेशीर कागदपत्र नाही तर एखाद्याची अवयवदान करण्याची इच्छा दर्शविणारे ते कार्ड आहे.मात्र अवयवदानासाठी कुटुंबातील सदस्यांची परवानगी मागितली जाते. मेंदू मृत झाल्याच्या स्थितीमध्ये यकृत, हृदय, फुप्फुस, मूत्रपिंड, आतडे यांसारखे महत्त्वपूर्ण अवयव आणि कॉर्निया, हृदयाचे व्हॉल्व, त्वचा, हाडे, अस्थी, शिरा, नस दान करता येते.ज्या व्यक्तीचा मेंदू मृत पावला आहे (इ१ं्रल्ल ऊीं)ि आणि ज्याला मृत्यूनंतरचे अवयवदान म्हटले जाते, त्याचे प्रमाण भारतात अजूनही कमी आहे. स्पेनमध्ये दहा लाख लोकांमागे ३५ लोक अवयवदान करणारे आहेत. ब्रिटनमध्ये ही संख्या दहा लाख लोकांमागे २७ लोक आणि अमेरिकेत ११ लोक इतकी आहे. तर भारतात हेच प्रमाण केवळ 0.१६ लोक इतके अत्यल्प आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत