शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेतीन हजार रुग्ण प्रतीक्षेत, अवयवदानाविषयी गैरसमज दूर करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:17 IST

अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते.

 - स्नेहा मोरेमुंबई : अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते. अवयवदानाविषयी जनजागृती होऊनही सध्या मुंबईतील जवळपास ३ हजार ५०० हून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत. त्यामुळे अजूनही अवयवदानाविषयी जनजागृतीसह त्याविषयीचे गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.दरवर्षी २.१ लाख भारतीयांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, मात्र प्रत्यक्षात केवळ ३000-४000 मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. हृदय प्रत्यारोपणाच्या बाबतीतही परिस्थिती काही वेगळी नाही. देशभरात दरवर्षी ४ ते ५ हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना, केवळ १00 लोकांचे हृदय प्रत्यारोपण होऊ शकते. सध्या मुंबईत एकूण २५ रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत, तर यकृत प्रत्यारोपणासाठी २६५, फुप्फुसासाठी पाच ते सहा व्यक्ती प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक ऊर्मिला महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली.अवयवदात्यांची कमतरता ही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील प्रमुख समस्या आहे. जागरूकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुºया पायाभूत सुविधा यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे, असे मत अवयवदान चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत आपटे यांनी व्यक्त केले. एका व्यक्तीने अवयवदान केले तर आठ जणांना नवसंजीवनी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक लोकांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.दाता कार्ड ही औपचारिकतातुमची अवयवदान करण्याची इच्छा आहे हे सांगण्यासाठी दाता कार्डवर स्वाक्षरी करणे ही पहिली पायरी आहे. दाता कार्ड हे कायदेशीर कागदपत्र नाही तर एखाद्याची अवयवदान करण्याची इच्छा दर्शविणारे ते कार्ड आहे.मात्र अवयवदानासाठी कुटुंबातील सदस्यांची परवानगी मागितली जाते. मेंदू मृत झाल्याच्या स्थितीमध्ये यकृत, हृदय, फुप्फुस, मूत्रपिंड, आतडे यांसारखे महत्त्वपूर्ण अवयव आणि कॉर्निया, हृदयाचे व्हॉल्व, त्वचा, हाडे, अस्थी, शिरा, नस दान करता येते.ज्या व्यक्तीचा मेंदू मृत पावला आहे (इ१ं्रल्ल ऊीं)ि आणि ज्याला मृत्यूनंतरचे अवयवदान म्हटले जाते, त्याचे प्रमाण भारतात अजूनही कमी आहे. स्पेनमध्ये दहा लाख लोकांमागे ३५ लोक अवयवदान करणारे आहेत. ब्रिटनमध्ये ही संख्या दहा लाख लोकांमागे २७ लोक आणि अमेरिकेत ११ लोक इतकी आहे. तर भारतात हेच प्रमाण केवळ 0.१६ लोक इतके अत्यल्प आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत