शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

"१५ दिवस थांबा, महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 17:00 IST

१५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच मोठे राजकारण होणार आहे. त्यामुळे आपण १५ दिवस वाट पाहूया असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुंबई - राज्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आलेले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधान माध्यमांमध्ये चर्चेत आले आहे. १५ दिवस वाट पाहा, मग काय होते ते कळेल असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी राजकीय वर्तुळातील चर्चेवर भाष्य केले आहे. त्यामुळे नेमकं राज्यात काय घडणार? अजित पवार काय निर्णय घेणार? याबाबत विविध चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच मोठे राजकारण होणार आहे. त्यामुळे आपण १५ दिवस वाट पाहूया. २ ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणारच आहेत असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत पत्रकारांनी राज्यातील सरकार कोसळणार का असं विचारले असता १५ दिवसांची वाट पाहा सर्व काही समजेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे १५ दिवसांनी राज्यात काय होणार असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

अजित पवार यांच्या नावाची अफवानागपूरात एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे तर दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यातच अजित पवार हे भाजपात सहभागी होऊ शकतात अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याची बातमी समोर आली परंतु अजित पवारांनी याबाबत स्पष्ट शब्दात नकार दिला. ती बातमी खोटी असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केले. 

शरद पवारांनी अदानी प्रकरणात घेतलेली भूमिका, त्यानंतर अजित पवारांनी पीएम मोदी यांच्या डिग्रीवरून सुरू असलेल्या वादावर केलेले भाष्य यामुळे राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार असं म्हटलं गेले. इतकेच नाही तर EVM वरही अजित पवारांनी भरवसा दाखवला.  अलीकडेच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देशाच्या हितासाठी राष्ट्रवादीसोबत येणार असेल तर हरकत नाही. आम्ही त्यांचे स्वागत करू असं म्हटलं. राज्याच्या राजकारणात उमटणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पडद्यामागून मोठ्या हालचाली सुरू झाल्यात का? असा प्रश्न पडतोय. त्यात प्रकाश आंबेडकरांनी १५ दिवस थांबा हे विधान करून नव्या चर्चेला उधाण आणले आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAjit Pawarअजित पवार