शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 21:32 IST

'मुख्यमंत्री बनने माझे प्राधान्य नाही. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे, हे आमचे प्राधान्य आहे.'

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे, हे माझ्ये प्राधान्य नाही, तर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणे प्राधान्य आहे, अशी स्पष्टोक्ती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबतच त्यांनी महाविकास आघाडीला आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आव्हानदेखील केले. तसेच, भाजपच्या लोकसभेतील खराब कामगिरीचे कारणही सांगितले. 

व्होट जिहादमुळे लोकसभेला आमचे नुकसान 

टीव्ही9 च्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेवेळी एक फेक नरेटिव्ह चालला गेला. लोकसभेत महाविकास आघाडीला 43.9 टक्के मते मिळाली, तर महायुतीला 43.6 टक्के मते मिळाली. पॉइंट तीन टक्क्यांनी ते आमच्या पुढे होते. पण जागांमध्ये मोठी उलटफेर झाली. त्यात दोन कारणे आहेत. संविधान बदलले जाईल, आरक्षण जाईल असे सांगितले जात होते. आम्ही ते काऊंटर करण्यात कमी पडलो. तसेच, महाराष्ट्रात आम्हाला आमचा अतिआत्मविश्वास नडला. महाराष्ट्रात व्होट जिहादमुळे आमचे नुकसान झाले. धार्मिक स्थळांना आमच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले, पण व्होट जिहादच्या माध्यमातून जे काही झाले, ते आता विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. आता महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन होईल. आता परिस्थिती बदलली आहे. संविधान बदलणार नाही, आरक्षणाला धोका नाही हे लोकांना माहीत आहे. आपल्या हातात संविधान घेऊन जाणारे राहुल गांधी आरक्षण संपवले पाहिजे, असे परदेशात जाऊन सांगतात. आरक्षण संपवण्याचा फॉर्म्युला सांगतात आणि नाना पटोले त्यांचे समर्थन करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार?यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाबाबत महत्वाचे भाष्य केले. मुख्यमंत्री बनने माझे प्राधान्य नाही. पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे, हे आमचे प्राधान्य आहे. महाविकास आघाडी जेव्हा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करेल, त्याच्या 15 मिनिटांत आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करू. आमचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्याकडे चेहरा आहे, पण विरोधकांकडे कोणता चेहरा आहे, हे त्यांना विचारा. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आमचे पक्षश्रेष्ठी बसून घेतीत. जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत आम्ही राहू, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस