शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आरोपी स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय, म्हणून पोलिसांवर दबाव आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 21:17 IST

आरोपी हा स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव आहे का? असा सवाल ही विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.

पालघर: मोखाडा येथील काळू पवार ह्या आदिवासी कामगाराच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसां कडून वेठबिगारीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे ह्यांनी जिल्ह्यात कुठेही वेठबिगारी नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.ह्यावर आज श्रमजीवीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित ह्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे पोलिसांना नाही असे सांगून आरोपी हा स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव आहे का? असा सवाल ही विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.

मोखाडा येथील काळू पवार या शेतमजुराने वेठबिगारीतून केवळ ५०० रुपयांसाठी आत्महत्या केल्याच्या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक  विवेक पंडित यांनी मनोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया दिली. पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असे म्हणत, गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.  तसेच मालक वर्गाने मजुरांना आगावू रक्कम (बयाना)देऊ नये, अन्यथा वेठबिगारी विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील असा इशारा देखील त्यांनी ह्यावेळी दिला.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नसल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिनांक २४ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी त्यांनी बाळू पवार यांनी आत्महत्या केली त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गावातच दफनविधी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. पवार याला नेहमी दारू पिण्याची सवय होती आणि  २ ऑगस्ट रोजी या आत्महत्या विषयी मोखाडा पोलिसांना प्रथम माहिती प्राप्त झाली असता मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलीस अधीक्षकांचे म्हणणे खोडून काढीत मृत पवार याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या जबाबात आपला मुलगा दत्तूच्या अंतिम संस्कार करण्यासाठी पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी ५०० रुपयाची उसनवारी केली हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता, शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी  म्हणून काम करत होता असे मृत कळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती विवेक पंडित ह्यांनी दिली.त्यामुळे या प्रकरणी गुन्ह्याचा तपास सुरू असताना  पोलीस अधीक्षक यांनी आहे प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे, गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचा प्रकार आहे असे  पंडित यांनी म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असून गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल  विवेक पंडित यांची उपस्थित केला आहे. तसेच,आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता असून, स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय आहे. म्हणून पोलिसांवर दबाव आहे का?असाही प्रश्न  विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.या पत्रकार परिषदेला मृत काळू पवार यांची पत्नी सावित्री काळू पवार आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघरVasai Virarवसई विरार