शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

आरोपी स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय, म्हणून पोलिसांवर दबाव आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 21:17 IST

आरोपी हा स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव आहे का? असा सवाल ही विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.

पालघर: मोखाडा येथील काळू पवार ह्या आदिवासी कामगाराच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसां कडून वेठबिगारीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे ह्यांनी जिल्ह्यात कुठेही वेठबिगारी नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.ह्यावर आज श्रमजीवीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित ह्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे पोलिसांना नाही असे सांगून आरोपी हा स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव आहे का? असा सवाल ही विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.

मोखाडा येथील काळू पवार या शेतमजुराने वेठबिगारीतून केवळ ५०० रुपयांसाठी आत्महत्या केल्याच्या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक  विवेक पंडित यांनी मनोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया दिली. पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असे म्हणत, गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.  तसेच मालक वर्गाने मजुरांना आगावू रक्कम (बयाना)देऊ नये, अन्यथा वेठबिगारी विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील असा इशारा देखील त्यांनी ह्यावेळी दिला.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नसल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिनांक २४ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी त्यांनी बाळू पवार यांनी आत्महत्या केली त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गावातच दफनविधी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. पवार याला नेहमी दारू पिण्याची सवय होती आणि  २ ऑगस्ट रोजी या आत्महत्या विषयी मोखाडा पोलिसांना प्रथम माहिती प्राप्त झाली असता मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलीस अधीक्षकांचे म्हणणे खोडून काढीत मृत पवार याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या जबाबात आपला मुलगा दत्तूच्या अंतिम संस्कार करण्यासाठी पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी ५०० रुपयाची उसनवारी केली हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता, शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी  म्हणून काम करत होता असे मृत कळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती विवेक पंडित ह्यांनी दिली.त्यामुळे या प्रकरणी गुन्ह्याचा तपास सुरू असताना  पोलीस अधीक्षक यांनी आहे प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे, गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचा प्रकार आहे असे  पंडित यांनी म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असून गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल  विवेक पंडित यांची उपस्थित केला आहे. तसेच,आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता असून, स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय आहे. म्हणून पोलिसांवर दबाव आहे का?असाही प्रश्न  विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.या पत्रकार परिषदेला मृत काळू पवार यांची पत्नी सावित्री काळू पवार आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघरVasai Virarवसई विरार