शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

CoronaVirus: कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 9:08 PM

Coronavirus कोरोना घराबाहेर आहे, त्यामुळे घरातच राहा; मुख्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

मुंबई: कोरोनाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घरीच राहा, अनावश्यक गर्दी टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय अतिशय धाडसी आहे. मात्र तुमच्यावर विश्वास ठेऊन मी हा निर्णय घेतला आहे, असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून येत्या काही दिवसांत कोरोना गुणाकार करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपण अन्नधान्याची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तुमच्यावर विश्वास दाखवून घेतला आहे. गर्दी टाळण्याच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे कृपया दुकानांमध्ये गर्दी करू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.  परराज्यातून आलेले काही जण त्यांच्या गावाला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहतूक बंद असल्यानं ते जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. परराज्यातून आलेल्यांनी धोकादायक प्रवास करू नये. त्यांनी इथंच थांबावं. राज्य सरकार त्यांची काळजी घेईल. कारण हीच आपली संस्कृती आहे. माणूस जगवायचा आहे. त्यासाठी माणुसकी जपायलाच हवी, असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले.  कोरोनाची लक्षणं दिसल्यास तातडीनं रुग्णालयात जा. वेळेवर उपचार घेतल्यास कोरोना बरा होतो. कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक जण ठणठणीत बरे झाले असून त्यांच्या घरी परतले आहेत. त्यामुळे चिंता करू नका, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कोरोनाचा विषाणू तुमच्या घराबाहेर आहे. तुमच्या घरात नाही. त्यामुळे तुम्ही घरात सुरक्षित आहात. घराबाहेर पडू नका. परिस्थिती आव्हानात्मक आहे. तुम्ही सकारात्मक राहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे